नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक शोषणाशी संबंधित मोठा रॅकेट उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे नोंदवले आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, कंपनीतील काही कर्मचारी संगनमताने विशिष्ट धर्मीय तरुणींना लक्ष्य करत होते आणि त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीचा वापर केला जात होता.
या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि धक्कादायक होती.
व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे टार्गेट निवड : आरोपींनी कंपनीत गुप्त व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये पुढील “सावज” कोण असेल याची चर्चा होत असे.
स्वतंत्र ग्रुपमध्ये ब्रेनवॉश : एखादी तरुणी लक्ष्य झाल्यानंतर तिच्यासाठी स्वतंत्र ग्रुप तयार केला जाई आणि तिच्यावर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाई.
फ्लर्टिंग आणि विश्वास संपादन : आरोपी स्वतःला अविवाहित असल्याचे भासवत, गोड बोलून आणि कौतुक करून तरुणींशी जवळीक साधत.
आमिषे आणि दबाव तंत्र : “बदली करून देतो”, “रजा मिळवून देतो” अशा आश्वासनांद्वारे तरुणींना जाळ्यात ओढले जात होते.
बाहेर भेटी आणि जवळीक वाढवणे : जेवण किंवा इतर बहाण्यांनी बाहेर भेटी घेऊन वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत होता.
मानसिक छळ : ज्या तरुणींनी विरोध केला त्यांना मानसिक त्रास देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडले जात होते.
या संपूर्ण प्रकरणात धर्मांतर, छेडछाड, फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. अनेक पीडितांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. तपासादरम्यान व्हॉट्सअॅप चॅट्स, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतरांचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
इस्रायलने दावा केला, इराणची विद्यमान राजवट आणखी ‘कट्टर’
समान नागरी कायदा, महिलांना दरमहिना ३ हजार रु…भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये संकल्प
इस्लामाबाद लॉकडाउनमध्ये; अमेरिका-इराण चर्चेसाठी नागरिक घरातच बंद
जागतिक अनिश्चिततेत ‘सोन्याची’ सुरक्षित गुंतवणूक; केंद्रीय बँकांची विक्रमी खरेदी
या प्रकरणी एका महिलेने या या मोडस ऑपरेंडीचा प्रकार समोर आणला आहे. या महिलेला आपल्या जाळ्यात ओढत या कंपनीतील जिहादी रॅकेटमधील लोकांनी तिला पदोन्नतीचे आमिष देत फसवले. यानंतर या महिलेवर अनेक निर्बंध घालण्यात आली. लिपस्टीक न लावणे, रोजे पाळण, कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांशी न बोलणे असे बंधने टाकल्याचे या महिलेने सांगितले.
या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून केला जात असून आणखी पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील अंतर्गत नियंत्रण यंत्रणा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजातून संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ही घटना केवळ गुन्हेगारी नसून सामाजिक आणि मानसिक शोषणाचे गंभीर उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.







