31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेषमेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू

मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू

Google News Follow

Related

केरळच्या उत्तरेकडील मलप्पुरम जिल्ह्यातील ४७ वर्षीय व्यक्तीचा अमीबिक मेनिंजोएन्सेफलायटिस या आजारामुळे मृत्यू झाला. गेल्या एका महिन्यात मेंदूवर आघात करणाऱ्या या भीषण अमीबामुळे झालेला हा सहावा मृत्यू आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील चेलेम्परा चालिपरम्बू येथील रहिवासी शाजी यांना ९ ऑगस्ट रोजी कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (KMCH) मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

या आठवड्यात या आजारामुळे झालेला हा दुसरा तर गेल्या एका महिन्यातील सहावा मृत्यू आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शाजी यांना यापूर्वी यकृताचे आजार होते आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या औषधांचा त्यांच्या शरीरावर काहीही परिणाम होत नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली, मात्र संक्रमणाचा स्रोत अजूनही स्पष्ट झालेला नाही.

हेही वाचा..

चंदन तस्करांचा धुमाकूळ

अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणात सहा जणांना अटक

भारत आणि मॉरिशस राष्ट्रे वेगळी पण स्वप्न एकच

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

याच आठवड्यात मलप्पुरमच्या वंदूर येथील एका महिलेचा याच आजारामुळे KMCH मध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान, बुधवारी १० वर्षीय मुलगी आणि आणखी एका महिलेच्या तपासणीत या संक्रमणाची खात्री झाली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की KMCH सह इतर रुग्णालयांत गेल्या महिन्यापासून या आजाराचे १० रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. अमीबाचा स्रोत शोधण्यात अपयश आल्यामुळे राज्यातील, विशेषतः उत्तरेकडील भागातील संसर्ग नियंत्रणाच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत. मागील एका महिन्यात याच आजारामुळे तीन महिन्यांच्या एका अर्भकासह नऊ वर्षांच्या मुलीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

सलग होत असलेल्या मृत्यूंमुळे आरोग्य विभागाला या आजाराबाबत देखरेख वाढवावी लागली आहे आणि जनजागृती मोहिमा राबवाव्या लागत आहेत. हा आजार प्रामुख्याने जलजन्य अमीबामुळे होतो. अमीबिक मेनिंजोएन्सेफलायटिस हा मेंदूतील एक गंभीर संसर्ग आहे, जो मुक्तजीवी अमीबा, प्रामुख्याने नेगलेरिया फाउलेरी मुळे होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा जिवाणू दूषित गोड्या पाण्यात पोहताना किंवा डुबकी मारताना नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मेंदूत सूज येते व ऊतकांचे नुकसान होते. हा आजार संसर्गजन्य नाही आणि दूषित पाणी पिल्याने तो पसरत नाही. काही तज्ज्ञांनी या प्रकरणांच्या वाढीचे कारण हवामान बदलाशी जोडले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा