32 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरविशेषजिना यांचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न!

जिना यांचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न!

सय्यदा हमीद यांना मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी फटकारले 

Google News Follow

Related

सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी नियोजन आयोगाच्या सदस्या सय्यदा हमीद यांच्या विधानाने आसाममध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. खरं तर, अलिकडच्या आसाम दौऱ्यात सय्यदा हमीद यांनी बांगलादेशी लोक भारतात राहू शकतात असे विधान करून वाद निर्माण केला आहे. आता मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सय्यदा हमीद सारख्या लोकांमुळेच आसामी संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एक्सवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये, सरमा यांनी सय्यदा हमीद यांच्यावर आसामला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे “जिन्नाचे स्वप्न” साकार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

“गांधी कुटुंबाच्या जवळच्या विश्वासू सय्यदा हमीदसारखे लोक बेकायदेशीर घुसखोरांना कायदेशीर मान्यता देतात, कारण ते जिना यांचे आसामला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतात. आज, त्यांच्यासारख्या लोकांच्या मूक पाठिंब्यामुळे आसामी ओळख नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण आम्ही लचित बर्फुकनचे पुत्र आणि कन्या आहोत, आम्ही आमचे राज्य आणि आमची ओळख वाचवण्यासाठी आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू,” असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

“मी हे अगदी स्पष्टपणे सांगतो की, बांगलादेशी लोकांचे आसाममध्ये स्वागत नाही, ही त्यांची भूमी नाही. ज्यांना बांगलादेशीबद्दल पुळका येत असेल तर त्यांनी त्यांना त्यांच्या घरी घेवून जावे. आसाम बेकायदेशीर घुसखोरांसाठी नाही, आताही नाही आणि कधीही नाही, ” असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
हे ही वाचा : 
सय्यदा हमीद यांनी काय म्हटले?
खरंतर सय्यदा हमीद यांनी एका शिष्टमंडळासह आसामला भेट दिली होती. सय्यदा हमीद व्यतिरिक्त, हर्ष मंदर, वजाहत हबीबुल्लाह, फयाज शाहीन, प्रशांत भूषण, जवाहर सरकार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या लोकांनी सरकारने रिकामे केलेल्या भागांना भेट दिली.
या दरम्यान, माध्यमांशी बोलताना सय्यदा हमीद म्हणाल्या, ‘बांगलादेशी असण्यात काय चूक आहे? बांगलादेशी देखील मानव आहेत; पृथ्वी खूप मोठी आहे, बांगलादेशी देखील येथे राहू शकतात. अल्लाहने ही पृथ्वी मानवांसाठी निर्माण केली आहे, सैतानासाठी नाही. माणसाला इतक्या निर्दयीपणे का बेदखल करावे?’ तिने आसाम सरकारवर बेदखल मोहिमेदरम्यान अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध अमानवी कृत्ये केल्याचा आरोप केला. 
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा