आसाम सरकार पुढील अधिवेशनात “लव्ह जिहाद” आणि बहुपत्नीत्वाविरुद्ध विधेयके मांडण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (२२ ऑक्टोबर) सांगितले की नोव्हेंबरच्या विधानसभेच्या अधिवेशनात या मुद्द्यांवर कायदा मांडला जाईल. सत्रांच्या (वैष्णव मठ) जमिनींचे संरक्षण करण्यासाठीही विधेयके मांडली जातील. चहा बागायतदारांना जमीन हक्क देण्याचाही सरकार विचार करत आहे. या निर्णयांची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केली जाईल. हे पाऊल समुदायांना सक्षम बनवण्यासाठी आणि राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचे रक्षण करण्यासाठी सरकारच्या पुढाकाराचा एक भाग आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गायक झुबिन गर्ग यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की काही लोक झुबिनच्या मृत्यूचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहेत. सरमा म्हणाले की ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात झुबिन गर्गचे एकही गाणे ऐकले नाही ते रातोरात या प्रतिष्ठित गायकाचे चाहते बनले आहेत. हे खूप दुर्दैवी आहे. काही लोक निवडणुकीपूर्वी राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही हे घडू देणार नाही.
हे ही वाचा :
बिहारमधील कुख्यात रंजन पाठक-मनीष पाठक टोळीचा खात्मा; चौघांचा ‘एन्काऊंटर’
भाई जगताप म्हणतात, उद्धव ठाकरेंशी युती नको!
सूर्यनमस्कारापासून वज्रासनापर्यंत…
The next Assembly session will be historic as many significant bills will be introduced – bill to ban polygamy and Love Jihad, Bill to preserve our Satras, bill to confer land rights to our tea garden workers among others. pic.twitter.com/iEyLPXWeIr
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 22, 2025
‘मोई झुबिन, अमिउ झुबिन’ मोहीम सुरू
मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, सरकारने बुधवारी नलबारी येथून ‘मोई झुबिन, अमिउ झुबिन’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश आसाम अस्थिर करण्याचे षड्यंत्र थांबवणे आणि खऱ्या झुबिन चाहत्यांना एकत्र आणणे हा आहे. दरम्यान, झुबिन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये रहस्यमय परिस्थितीत निधन झाले. त्यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात निदर्शने होत आहेत. राज्यात सामाजिक सौहार्द राखण्यासाठी आणि समुदायांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.







