32 C
Mumbai
Wednesday, April 8, 2026
घरविशेषउबाठाचे गाणे 'उतलो माय, मातलो गं माय' असं हवं होतं !

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने नवीन गाणे देखील लाँच केले आहे. ‘मशाल हाती दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. दरम्यान, उबाठा गटाच्या गाण्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार ट्वीटकरत म्हणाले, गाणं असं असायला हवं होतं! उतलो माय… मातलो गं माय.. घेतला वसा टाकला गे माय… गणपतीची आरती हातात घेतली नव्हती, पांडूरंगाची तुळसी माळ गळ्यात घातली नव्हती, पंढरपूरात जाणारी वारकऱ्यांची वारी रोखली होती, लालबागच्या राजाची परंपरा राखली नव्हती.

ते पुढे म्हणाले, हे कुलस्वामिनी एकवीरा आई मुख्यमंत्री झाल्यावर..तुझी पायरी सुध्दा दुरुस्त केली नव्हती, अहंकाराच्या दैत्याने घेरले होते माय… सत्ता गेली… पक्ष गेला, चिन्ह गेले. तुझा कोप झाला गं माय.. आता जाग आली माय म्हणून म्हणतो.. दार उघड बये… दार उघड… माझ्यातील अहंकाराला जाळण्यासाठी सत्वरी भूवरी ये.. अंबे उदो.. उदो..उदो.., असे आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा : 

नसरल्लाच्या मुलीनंतर इस्रायलने जावयालाही उडवले!

‘देवा इस्रायलला शक्ती दे, जेणेकरून सर्व नसरल्लांचा खात्मा होवो’

राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान ड्रग्ज विकते

एसबीआयच्या बनावट शाखेने गावकऱ्यांना फसवले

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा