विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!

विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबच्या होशियारपूरला पोहोचले आहेत. केजरीवाल पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर आता भाजपकडून त्यावर प्रतिक्रिया आली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटले की, दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर केजरीवाल यांनी आपला खरा रंग दाखवला आहे. मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी होशियारपूरला गेले, पण त्यांच्या ताफ्याचे दृश्य पाहण्यासारखे होते. त्यांच्या ताफ्यात पन्नासहून अधिक गाड्या होत्या. त्यात दोन-दोन कोटी रुपयांच्या लँड क्रूझर गाड्याही होत्या. याशिवाय १०० हून अधिक पोलीस कमांडो त्यांच्यासोबत होते. एवढेच नाही तर अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही ताफ्यात होत्या आणि ते म्हणतात की शांती मिळवण्यासाठी तिथे गेले आहेत. मी विचारतो, ही कसली शांती आहे, जिच्यासाठी पंजाबच्या जनतेच्या खजिन्यातून लाखो रुपये उडवले जात आहेत?

हेही वाचा..

२ एप्रिलचा अल्टिमेटम; भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा इशारा

प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

लष्करी मदत थांबवताच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास झेलेन्स्की तयार

मुख्यमंत्री भगवंत मान शेतकऱ्यांना म्हणतात, तुमच्या सडक रोकोमुळे पंजाबचे नुकसान!

ते पुढे म्हणाले, ही कसली शांती आहे, जिच्यासाठी संपूर्ण होशियारपूर जागं केलं जात आहे आणि ही कसली शांती आहे, जिच्यासाठी १०० हून अधिक कमांडो तैनात करण्यात आले आहेत? अरविंद केजरीवाल आधी स्वतःला मसीहा म्हणवत होते आणि वॅगन-आर गाडीत फिरत होते. पण सत्ता मिळताच त्यांनी आपला खरा रंग दाखवला. आता त्यांना विपश्यनेसाठी देखील १०० कमांडो आणि ५० गाड्यांचा ताफा लागतो. यापेक्षा कमी सुविधांमध्ये त्यांची विपश्यना होत नाही का?”

मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ देखील शेअर केला. त्यांनी प्रसिद्ध तत्त्वज्ञ प्लेटो यांच्या वचनाचा संदर्भ देत लिहिले, “एका व्यक्तीचे खरे मोजमाप हे त्याने सत्तेचा कसा उपयोग केला यावरून होते. अरविंद केजरीवाल, जे कधी वॅगन-आर मध्ये सामान्य माणसासारखे फिरत होते, आता बुलेटप्रूफ लँड क्रूझर, १०० हून अधिक पंजाब पोलीस कमांडो, जैमर आणि अँब्युलन्सच्या भव्य ताफ्यात फिरतात, जणू एखादा वीआयपी महाराज जो शांतीसाठी विपश्यनेसाठी जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “जर सत्ता ही त्यांची खरी परीक्षा होती, तर ते यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. कोणत्या प्रकारच्या ‘विपश्यने’ साठी पंजाबच्या करदात्यांच्या पैशातून वित्तपुरवठा केलेल्या अशा भव्य सुरक्षा ताफ्याची गरज भासते? एवढंच नाही, तर मुख्यमंत्री भगवंत मानही त्यांच्या ताफ्यात नाहीत. तुमची खरी ओळख उघड झाली आहे—फसवणूक, ढोंग आणि वीआयपी अहंकार आपल्या उच्चांकावर आहे.”

Exit mobile version