29 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषगुन्हेगारी घटना चिंतेचा विषय, भविष्यात सुधारणा आवश्यक

गुन्हेगारी घटना चिंतेचा विषय, भविष्यात सुधारणा आवश्यक

चिराग पासवान यांचे मत

Google News Follow

Related

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाय केले पाहिजेत आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

पटण्यात पत्रकारांशी बोलताना पासवान म्हणाले की, बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली आहे, जी नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र, बिहार सरकारने या विषयाला गांभीर्याने घेतले आहे याची खात्री आहे. मी केंद्र सरकारचा भाग आहे, पण राज्य सरकारचा सहयोगी म्हणून मी वेळोवेळी या विषयांना उचलण्याचे काम केले आहे.

त्यांनी सांगितले की, “मी मानतो की या घटनांमधून धडा घेत भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सरकार ठामपणे काम करेल.” मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या तब्येतीबाबत उठणाऱ्या प्रश्नांवर ते म्हणाले, “कुठल्याही राजकीय पक्षाने मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक आरोप करणे योग्य नाही. राजकीय दृष्टिकोनातून हे अयोग्य आहे.”

हेही वाचा..

कर्नाटक : १५० फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू!

१० वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट

गाझा येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा नेता सलाह अल-बर्दावील ठार

भगवान आदिनाथ जन्म कल्याणक महोत्सव : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता झाल्या सहभागी

चिराग पासवान यांनी अशा लोकांना सल्ला दिला की, “आपण सरकारला त्यांच्या धोरणांवर प्रश्न विचारा. सरकार उत्तर देण्यासाठी तयार आहे आणि त्यांना द्यावेच लागेल. पण, वैयक्तिक पातळीवर प्रश्न विचारणे योग्य नाही.”

काही मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्री आणि लोजपा (रामविलास) यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “अशा संघटनांना त्यांच्या चिंता असतील, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, ज्यांना त्यांनी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी मानले आहे, त्यांनी खरोखरच त्यांच्या हितांचे संरक्षण केले आहे का? जे लोक राजदच्या इफ्तारमध्ये जात आहेत, त्यांनी मुस्लिमांसाठी नेमके काय केले आहे, हेही विचारले पाहिजे.”

त्यांनी पुढे म्हटले की, “हे लोक अनेक वर्षे सत्तेत होते, पण मुस्लिम समाजाच्या परिस्थितीत सुधारणा झाली का? त्यांनी त्यांच्यासाठी काय केले? आमचे वडील, स्व. रामविलास पासवान यांनी बिहारमध्ये मुस्लिम मुख्यमंत्री करण्यासाठी स्वतःची पक्षसंघटनाही दावणीला लावली होती. त्या वेळी राजदसारख्या पक्षांनी नेमके काय केले होते?”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा