27 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरविशेष२४ डिसेंबर : विश्वनाथन आनंद पहिल्यांदा विश्वविजेते ठरले

२४ डिसेंबर : विश्वनाथन आनंद पहिल्यांदा विश्वविजेते ठरले

Google News Follow

Related

बुद्धिबळाच्या जगात विश्वनाथन आनंद यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. शह-मातच्या या खेळात जगातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत आनंद यांनी जागतिक पातळीवर भारताचा आणि स्वतःचा दबदबा निर्माण केला. विश्वनाथन आनंद पाच वेळा विश्वविजेते ठरले आहेत. त्यांनी आपले पहिले विश्वविजेतेपद २००० साली जिंकले. ११ डिसेंबर १९६९ रोजी तमिळनाडूतील मयिलादुथुराई येथे जन्मलेल्या आनंद यांना लहानपणापासूनच बुद्धिबळाची आवड होती. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षीच ते स्वतःपेक्षा मोठ्या मुलांवर मात करू लागले होते. १४ व्या वर्षी ते सब-ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियन झाले, तर १५ व्या वर्षी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. १९८८ मध्ये, वयाच्या १९ व्या वर्षी, विश्वनाथन आनंद भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले.

बुद्धिबळात सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत असलेल्या विश्वनाथन आनंद यांच्यासाठी २००० हे वर्ष अत्यंत गौरवाचे ठरले. याच वर्षी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करत त्यांनी पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. २००० मधील फिडे विश्वचषक स्पर्धा २७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि तेहरान येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आनंद यांनी अलेक्सी शिरोव यांचा पराभव करून किताब जिंकला. पुढील एका दशकात बुद्धिबळातील ‘आनंद युग’ सुरू होण्याचा हा शंखनाद ठरला. त्यानंतर त्यांनी २००७, २००८, २०१० आणि २०१२ मध्येही विश्वविजेतेपद जिंकले.

हेही वाचा..

दित्वाह वादळ : श्रीलंकेसोबत उभे राहिल्याचा अभिमान

एमएसएमईच्या विकासात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची महत्त्वाची भूमिका

राहुल गांधी भारतविरोधी मोहीम राबवताहेत

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला ४५० दशलक्ष डॉलर्सचे मदत पॅकेज

५६ वर्षांचे झालेले आनंद यांनी बुद्धिबळातून पूर्णतः निवृत्ती घेतलेली नाही, मात्र सर्वोच्च पातळीवरील स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आता कमी झाला आहे. ते सध्या आपल्या अकादमीच्या माध्यमातून युवा खेळाडूंच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अधूनमधून ते स्पर्धाही खेळतात आणि फिडेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. जागतिक पातळीवर भारताला बुद्धिबळात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या विश्वनाथन आनंद यांना भारत सरकारने १९८५ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८८ मध्ये पद्मश्री, १९९१-९२ मध्ये खेळ रत्न, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा