23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषहिंदू-मुस्लिम सौहार्द हवे तर जबरदस्तीने धर्मांतरण, लव्ह जिहाद थांबले पाहिजे!

हिंदू-मुस्लिम सौहार्द हवे तर जबरदस्तीने धर्मांतरण, लव्ह जिहाद थांबले पाहिजे!

हिमंता बिस्वसर्मा यांनी केले वक्तव्य

Google News Follow

Related

‘लव्ह जिहाद’ विरोधात आवाज उठवणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले की, हे थांबवले पाहिजे कारण यामुळे समाजात तणाव निर्माण होत आहे. राज्याच्या पोलीस अधीक्षकांच्या दोन दिवसीय अधिवेशनानंतर बोंगईगाव येथे पत्रकारांशी बोलताना सरमा म्हणाले की, त्यांना राज्यातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शांततापूर्ण सहअस्तित्व हवे आहे परंतु “लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धार्मिक धर्मांतरण यांसारख्या समस्यांमुळे तणाव निर्माण होत आहे.

 

‘लव्ह जिहाद’च्या बहुतांश घटनांमध्ये असे दिसून येते की मुलींना जबरदस्तीने पळवून नेले जाते आणि नंतर त्यांचे काही व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले जाते, असे ते यावेळी म्हणाले. ”मुलींना बळजबरीने दुसर्‍या धर्मात धर्मांतरित करून दबावाखाली लग्न केले जात आहे का हे पाहावे लागेल… अशा विवाहांना कायदेशीर तपासाच्या कक्षेत आणावे लागेल,” असेही ते म्हणाले.

 

”काझी (मुस्लिम मौलवी) हिंदू-मुस्लिम विवाहाची नोंदणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे, एक हिंदू पुजारी देखील कायदेशीररित्या असे करू शकत नाही … जर वेगवेगळ्या धर्मातील मुला-मुलींना लग्न करायचे असेल तर त्यांनी ते विशेष विवाह कायद्यानुसार आणि धर्मांतर न करता विवाह करावे,” शर्मा म्हणाले. त्याच वेळी, त्यांनी पालकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे जेणेकरून ‘लव्ह जिहाद’ सारखी परिस्थिती उद्भवू नये कारण हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये सांस्कृतिक फरक आहे आणि दोघांपैकी मुलींना आंतरधर्मीय विवाहानंतर लोकांशी जुळवून घेणे कठीण जाते.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स’मध्ये मिळवले सुवर्णपदक

थ्रेड्सने निम्म्याहून अधिक वापरकर्ते गमावले, झुकरबर्गना धक्का

पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञान वापराचा नवा टप्पा; AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत

देशातील वाघांची झेप; संख्येत २४ टक्क्यांनी वाढ…आता ३६८२ वाघ

सरमा म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांचा तपास व्यापक करण्याच्या मार्गांवर अधिवेशनात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना ‘लव्ह-जिहाद’ प्रकरणांचा तपास करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे, जे राज्यातील जबरदस्तीने धर्मांतराचे मूळ कारण आहे. गोलाघाट येथे सोमवारी झालेल्या तिहेरी हत्याकांडात २५ वर्षीय मुस्लिम व्यक्तीने हिंदू पत्नी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केल्याचा दावा सरमा करत आहेत.

”आम्हाला राज्यात बालविवाह आणि बहुपत्नीत्व या दोन्हींवर सर्वसमावेशक बंदी घालायची आहे आणि यासाठी आम्ही कायदा आणू ज्यामुळे पोलिसांना या धोक्याचा प्रभावीपणे सामना करता येईल…बहुपत्नीत्वावर बंदी घालणे ही आमची वचनबद्धता आहे आणि आम्ही ते करूच, ” असे सरमा यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यात घोषणा केली होती की त्यांच्या सरकारने दोन वर्षे पूर्ण केली तेव्हा आसाम राज्यात बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी एक विधेयक आणले जाईल, आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा (शरीयत) कायदा, १९३७ च्या तरतुदींसह घटनेच्या कलम २५ ची छाननी करण्यात येईल, जे संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार समान नागरी संहितेच्या संबंधात असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा