जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो अशा बातम्याही समोर येत आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे मंत्री देखील तसा दावा करत आहेत. अशामुळे भयभीत झालेला पाकिस्तान मोठ्या दहशतवाद्यांना देखील वाचवण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी हाफिझ सईद आणि मसूद अझहरला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे.
एबीपीच्या बातमीनुसार, भारत आता नक्की कोणती कारवाई करेल याबाबत पाकिस्तान आपले वेगवेगळे अंदाज लावत आहे. भारत एखाद्या सिक्रेट ऑपरेशनद्वारे भारताचे शत्रू असलेल्या आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांना मारून टाकेल का? किंवा या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करेल का? अथवा पाकव्याप्त काश्मीरवरच हल्ला करणार आहे. तसेच समुद्रीमार्गे भारत काही करेल का?, अशी भीती पाकिस्तानला आहे.
हे ही वाचा :
‘तारीख पे तारीख…’ चित्रपट झाला ३२ वर्षांचा !
“आतंक का साथी राहुल गांधी” अमेठीत राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त का लागले पोस्टर्स?
‘हाउसफुल ५’ च्या टीझरने वाढवला सस्पेन्स
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सीसीएस बैठक
भारत नेमका काय करेल याचा अंदाज पाकिस्तानला मिळत नाहीये. त्यामुळे एक खबरदारीचा भाग म्हणून पाकिस्तानच्या वतीने दहशतवादी हाफिझ सईद आणि मसूद अझहर यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे.
हे दहशतवादी लाहोर मधील कोट लखपत कारागृहात बंद होते. आता यांना बहावलपूर कारागृहात हलवण्यात आले आहे. पाकिस्तानने कारागृहाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. भारतीय इंटेलिजन्स एजन्सीद्वारे किंवा सिक्रेट ऑपरेशनद्वारे दहशतवादी हाफिझ सईद आणि मसूद अझहर या दोघांना मारून टाकले जाईल, अशी भीती असल्याने पाकने त्यांची दुसऱ्या कारागृहात रवानगी केली आहे.