ते पुढे म्हणाले, ”राहुल गांधींबद्दल बोलायचे झाले तर ज्याप्रमाणे पाकिस्तानचे उपग्रह प्रक्षेपण प्रत्येक वेळी अपयशी ठरते, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचे राजकीय प्रक्षेपण प्रत्येक वेळी अपयशी ठरते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ५० हून अधिक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
शेतकरी आंदोलनाचा मुद्दा असो, यूपीतील दलित आरक्षणाचा मुद्दा असो, भारत जोडो यात्रा असो, अशी सर्व प्रक्षेपणे त्यांची फेल झाली आहेत. यानुसार, बिहारच्या एसआयआरचा मुद्दा देखील त्यांचा फेल होईल. जर त्यांना देशाच्या लोकशाहीवर विश्वास नसेल, तर त्यांनी लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा.”
तसेच भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यावरून जास्त प्रश्न उपस्थित करू शकत नाही आणि हे त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यांचा प्रत्येक दावा दोन सेकंदात ध्वस्त होत आहे. देशाने त्यांना आता चांगलेच ओळखले आहे, असे खासदार जोशी म्हणाले.
हे ही वाचा :
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना NDA चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर
जोशी म्हणाले, “एनडीएचे उमेदवार अतिशय साध्या पार्श्वभूमीतून आले असून विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आपले उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील आणि उत्कृष्ट कामगिरी करतील.”
#WATCH | Delhi: BJP MP Hemang Joshi says, "Just like Pakistan's satellite launch fails every time, Rahul Gandhi's political launch fails every time. In his career, he has made the Congress lose more than fifty elections under his leadership. The way Rahul Gandhi is influenced by… pic.twitter.com/MuRso78zwW
— ANI (@ANI) August 18, 2025







