27 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरविशेषफडणवीस सरकार विश्वविजेत्या टीममधील 'या' खेळाडूंना करणार सन्मानित

फडणवीस सरकार विश्वविजेत्या टीममधील ‘या’ खेळाडूंना करणार सन्मानित

कॅबिनेटने घेतला निर्णय

Google News Follow

Related

हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांना रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेल्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक केले. मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात सांगितले की, विश्वविजेता टीमचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केला आहे.

निवेदनात पुढे सांगितले, “कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आणि एकमताने प्रस्ताव मंजूर केला. तसेच महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारकडून रोख पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.”

हे ही वाचा:

बद्धकोष्ठतेपासून डायबिटीजपर्यंत प्रत्येक आजारावर उपाय काय ?

महिला पर्यटक छळप्रकरण: टॅक्सीचालकांचे परवाने रद्द होणार

मालवणीतील ढाकावर बुलडोजर फिरला; स्लम खानला देवाभाऊंचा दणका

जेवणासाठी हत्येचा थरार! साकिनाक्यात वादातून मित्राचा जीव घेतला

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या तिन्ही क्रिकेटपटू महाराष्ट्रातील आहेत. संपूर्ण महिला क्रिकेट संघ मुंबईत आल्यानंतर त्यांचा सत्कार केला जाईल. आज कॅबिनेटने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.” भारतीय संघ ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडू मुंबईहून उड्डाण करून मंगळवारी सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर आपल्या गावी रवाना होतील. गेल्या वर्षी टी२० विश्वचषक जिंकल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी रोहित शर्मा व त्यांच्या टीमची भेट घेतली होती.

अलीकडेच बिहारमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काल मुंबईत भारताच्या मुलींनी इतिहास घडवला. भारताने पहिल्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. २५ वर्षांनी जगाला नवीन विश्वविजेता मिळाला आहे आणि भारताच्या मुलींनी हा अभिमान देशाला मिळवून दिला आहे.”

पंतप्रधान म्हणाले, “ही विजय फक्त मैदानावरील यश नाही, तर भारताच्या मुलींच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.” भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून महिला विश्वकप वर नाव कोरले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा