29 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषपूर्व लडाखमधील भारत- चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण

पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण

डेमचोक आणि डेपसांग भागात १ नोव्हेंबरपासून पेट्रोलिंग सुरू

Google News Follow

Related

पूर्व लडाखमधील भारत आणि चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण झाली आहे. पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षग्रस्त भागात गस्त घालण्याची एक फेरी जवानांनी पूर्ण केली आहे. २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर ज्या भागात तणाव आहे त्या भागात दर आठवड्याला एक समन्वित गस्त करण्याचे भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने मान्य केले आहे.

डेमचोक आणि डेपसांग भागात १ नोव्हेंबरपासून पेट्रोलिंग सुरू झाली आहे. दोन्ही भागात एकदा भारतीय सैनिक आणि एकदा चिनी सैनिक गस्त घालत आहेत. गस्तीसाठी मर्यादित सैनिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. गस्त स्थानिक स्तरावर समन्वयित केली जाते आणि स्थानिक कमांडर एकमेकांशी बोलल्यानंतर ग्राउंड नियम ठरवतात. पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर, २१ ऑक्टोबर रोजी दोन्ही सैन्याने डेपसांग आणि डेमचोकमधून माघार घेण्याचा करार झाला. या दोन ठिकाणांवरील सर्व तात्पुरत्या पायाभूत सुविधा हटविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

ऑक्टोबरमध्ये कराराची चर्चा पूर्ण केल्यानंतर दोन्ही देशांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला या भागात पहिली समन्वित गस्त केली. प्रत्येक भागात, एक गस्त भारतीय सैन्याकडून केली जाईल आणि एक गस्त चिनी सैन्याकडून केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. या दरम्यान, सतत स्थिरता राखण्यासाठी, स्थानिक कमांडर स्तरावर ब्रिगेडियर आणि तत्सम दर्जाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या पथकांमध्ये चर्चा सुरू राहील. या चर्चांचे उद्दिष्ट पेट्रोलिंग प्रोटोकॉल परिष्कृत करणे आणि उर्वरित समस्यांचे निराकरण करणे आहे.

हे ही वाचा : 

जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!

दिल्लीच्या हवेत सुधारणा नाहीच; उत्तर प्रदेशसह पंजाब, आसाममध्येही दाट धुके

ट्रम्प सरकारमध्ये एलॉन मस्क, विवेक रामास्वामी यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसीची जबाबदारी

शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांचे!

दिवाळीच्या परंपरेचा भाग म्हणून, भारतीय आणि चिनी सैन्याने ३१ ऑक्टोबर रोजी मिठाईची देवाणघेवाण करत शुभेच्छा दिल्या. भारताने २१ ऑक्टोबर रोजी घोषित केले की, वास्तविक नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत चीनसोबत करार झाला आहे, ज्यामुळे जून २०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर शांतता प्रस्थापित करणे शक्य होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा