30 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरविशेष'अमृत भारत स्टेशन योजनेतून' नवा अध्याय !

‘अमृत भारत स्टेशन योजनेतून’ नवा अध्याय !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली. देशातील १३०९ लहान रेल्वे स्थानकांचा यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करत असलेला भारत आपल्या अमृत कालावधीच्या सुरुवातीला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू होत आहे. भारतातील सुमारे प्रमुख रेल्वे स्थानके आता अमृत भारत रेल्वे स्थानके म्हणून विकसित केली जातील आणि त्यांचा आधुनिकतेसह पुनर्विकास केला जाणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ‘जगातील रेल्वेचे जाळे जितके दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडन, यूके यांसारख्या देशांमध्ये आहे तितके एकट्या भारताने ९ वर्षात रेल्वे ट्रॅक बांधले आहेत. लोकांचा प्रवास हा सुलभ आणि आनंददायी व्हावा हे देशाचं उद्दिष्ट आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम बनवण्यात येत आहेत. तसेच, हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा भारत आपल्या अमृत कालावधीच्या सुरुवातीला आहे. आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, ३० वर्षांत पहिल्यांदाच देशात पूर्ण बहुमत असलेलं सरकार स्थापन झालं आहे. जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!

भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

ते पुढे म्हणाले, ‘अमृतकालच्या सुरुवातीला या ऐतिहासिक कार्यासाठी मी रेल्वे मंत्रालयाचे कौतुक करतो आणि सर्व देशबांधवांचे अभिनंदन करतो. आज संपूर्ण जगाची नजर भारतावर आहे. जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढली आहे. जगाचा दृष्टिकोन बदलण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतातील जनतेने तीन दशकांनंतर पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या शहरांची ओळख शहराच्या रेल्वे स्थानकांशीही जोडलेली आहे. त्यामुळे या स्थानकांवर जर एखादा परदेशी किंवा भारतीय पर्यटक पोहोचला तर आपल्या शहराचे पहिले चित्र चांगले दिसेल.

पंतप्रधानांनी या दरम्यान विरोधकांवरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, विरोधी पक्ष जुन्याच पद्धतीवर ठाम आहेत. स्वतः काही करणार नाही आणि काही करू देणार नाही. संसदेच्या नवीन इमारतीला विरोधकांनी विरोध केला. ७० वर्षांत शहिदांचे युद्ध स्मारकही केले नाही, स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान ज्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी ५५, बिहारमधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगालमधील ३७, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशातील २५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पंजाब, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी २२, झारखंडमध्ये २०, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १८, हरियाणामध्ये १५ आणि कर्नाटकमध्ये १३ आहेत. ४७० कोटींचा खर्च असून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

योजनेचा उद्देश
शहर केंद्रे म्हणून स्थानकांचा विकास
शहराच्या दोन टोकांचे एकत्रीकरण
स्टेशन इमारतींची सुधारणा आणि पुनर्विकास
आधुनिक प्रवासी सुविधांची तरतूद
उत्तम वाहतूक व्यवस्था आणि इंटरमॉडल इंटिग्रेशन
एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्ह
मास्टर प्लॅनमध्ये योग्य मालमत्ता विकासासाठी तरतूद
लँडस्केपिंग, स्थानिक कला आणि संस्कृती

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा