मुंबईतील लसीकरण अधूनमधून बंद होते. मात्र ठाकरे सरकार त्याचे खापर केंद्रावर फोडून मोकळे होते. प्रत्यक्षात मात्र ठाकरे सरकारचा चालू असलेला गलाथन कारभार वारंवार समोर आला आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला, जेव्हा मुंबईतील एकूण ४०१ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ९८ खासगी असूनही त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात लसीकरण केले गेले असल्याचे समोर आले. त्यामुळे ठाकरे सरकारचा लसींच्या अनुपलब्धतेचा आणि केंद्राकडून लसीच मिळत नसल्याचा कांगावा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
मुंबईमध्ये लसीकरण केंद्रांमार्फत नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामध्ये ९८ खासगी लसीकरण केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. खासगी लसीकरण केंद्रांद्वारे १ ते १० जुलै या काळात ३ लाख १४ हजार ३७१ लोकांचे लसीकरण करण्यात आले तर सरकारी केंद्रांद्वारे केवळ २ लाख ५८ हजार ९२३ नागरिकांचे लसीकरण केले होते.
हे ही वाचा:
… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार
एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?
केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्राला भीती नाही
विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत
शुक्रवारपासून सोमवारपर्यंत तीन दिवस मुंबईतील सरकारी लसीकण केंद्रे बंद होती. त्याचे खापर ठाकरे सरकारने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे केंद्र सरकारवर फोडले परंतु त्याचवेळी खासगी लसीकरण केंद्रांवर मात्र ७९ हजार ७१२ नागरिकांचे लसीकरण झाले होते.
मुंबईमध्ये सरकारी लसीकरण केंद्रे आणि खासगी लसीकरण केंद्रे देखील आहेत. मात्र लसीकरण बंद झाल्यास ठाकरे सरकार केंद्राकडून लसींच्या पुरवठा होत नसल्याचा कांगावा करते. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने वेगळेच चित्र समोर आणले आहे.