रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम हरी सिंघानिया यांचा मालदीवमध्ये अपघात झाला. सिंघानिया ज्या स्पीडबोटमधून प्रवास करत होते ती पलटल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, हा अपघात शुक्रवारी सकाळी मालदीवमधील वी फेलिधू परिसरात घडला, जेव्हा पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. बोटीत एकूण सात जण प्रवास करत होते. अहवालानुसार, या प्रवाशांमध्ये ब्रिटन आणि रशियाच्या दोन महिला आणि भारतातील पाच पुरुषांचा समावेश होता. अपघाताच्या वेळी पाच जण समुद्रात वाहून गेले, ज्यामध्ये एक रशियन महिला आणि चार भारतीय पुरुषांचा समावेश आहे.
या अपघातात गौतम हरी सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या प्रवक्त्याने घटनेची पुष्टी करताना सांगितले, “गौतम सिंघानिया यांना एका दुर्दैवी अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. ते मुंबईत योग्य उपचाराखाली असून प्रकृती सुधारत आहे. आपल्या शुभेच्छांसाठी आम्ही आभारी आहोत आणि प्रभावित व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”
हे ही वाचा:
आणखी दोन भारतीय एलपीजी टँकर होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार
दक्षिण आफ्रिकेचा पराभव, न्यूझीलंडचा जलवा!
भारताच्या फॉरेक्स साठ्यात मोठी घसरण; ७ अब्ज डॉलरने घट
प्रीमियम पेट्रोल महाग, प्रति लिटर ₹२ पर्यंत वाढ
अहवालानुसार, बेपत्ता व्यक्तींमध्ये रॅली ड्रायव्हर हरी सिंग यांचाही समावेश आहे. बचाव पथकांकडून समुद्रात शोधमोहीम सुरू असून ती अखंडपणे चालू आहे. हा अपघात एका लोकप्रिय पर्यटनस्थळी घडल्यामुळे समुद्री सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.







