29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषसीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न

सीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

Google News Follow

Related

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए) खोटेपणा पसरवून देशाला दंगलीकडे ढकलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांना फटकारले. पंतप्रधान मोदी म्हणाले, निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणे सीएए अंतर्गत आधीच सुरू झाले आहे आणि इंडी आघाडीतील लोक ते काढून टाकतील असा दावा करत असले तरी कोणीही सीएए समाप्त करू शकत नाही, असे ते म्हणाले.

आझमगडमधील एका रॅलीला संबोधित करताना, त्यांनी असा आरोप केला की काँग्रेसने अनेक दशकांपासून निर्वासितांचा छळ केला आणि मोदी गॅरंटी म्हणजे सीएए आहे. सीएए अंतर्गत निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणे आधीच सुरू झाले आहे. ते सर्व आपल्या देशात दीर्घकाळापासून राहत आहेत, ते असे लोक आहेत ज्यांना धर्माच्या आधारावर देशाच्या फाळणीमुळे त्रास सहन करावा लागला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसवाले महात्मा गांधींचे नाव घेऊन सत्ता मिळवतात. पण त्यांना महात्मा गांधींचे शब्द आठवत नाहीत. महात्मा गांधींनी स्वत: या लोकांना (शेजारी देशांत राहणारे अल्पसंख्याक) त्यांना हवे तेव्हा भारतात येऊ शकते याची खात्री करून दिली होती. गेल्या ७० वर्षांत हजारो कुटुंबांनी आपली संस्कृती आणि धर्म जपण्यासाठी भारतात आश्रय घेतला आहे. मात्र, काँग्रेसने त्यांचा विचार करण्याची तसदी घेतली नाही कारण ती काँग्रेसची व्होट बँक नव्हती. सपा, काँग्रेस आणि इंडी आघाडी सीएएबद्दल खोटे पसरवत आहेत आणि देशात दंगल व्हाव्ही असा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा..

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला, २ दहशतवादी ठार!

भारतीय वायूसेनेचे ‘भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल’ अवतरले!

लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!

पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदींनीच तुमचा खरा चेहरा उघडा केला आहे. तुम्ही ढोंगी, जातीयवादी आहात. तुम्ही या देशाला ६० वर्षे जातीयवादात अडकवले. मी स्पष्टपणे सांगतोय, ही मोदींची हमी आहे. ‘देश-विदेश कहीं से भी, जो भी ताकत इकठ्ठी करनी है कर लो’… तुम्ही सीएए संपवू शकत नाही. आम्ही फाळणीच्या बळींना नागरिकत्व देण्याचे काम करत आहोत, जे सीएए अंतर्गत आधीच सुरू झाले आहे.

आपण पहिल्यांदाच बघत आहे की, भारतातील लोकशाहीच्या उत्सवासंबंधीच्या बातम्या जगभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर आहेत. भारताची ओळख जगासाठी किती महत्त्वाची आहे याचा हा पुरावा आहे. जनतेचा आशीर्वाद भाजप-एनडीए आणि आपल्या सर्व मित्रांवर आहे, हे जग पाहत आहे. श्रीनगरच्या लोकांनी मतदानात दाखवलेला उत्साह हा पुरावा आहे की कलम ३७० परत आणून कोणीही “व्होट बँकेचे” राजकारण करू शकत नाही.

“देश में कोई माई का लाल पेडा हुआ है जो सीएए होता है? सीएए कोणीही हटवू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केल्यानंतर दोन महिन्यांनंतर बुधवारी केंद्र सरकारने नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच बुधवारी सुपूर्द केला. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी काही अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निवेदनानुसार गृह सचिवांनी अर्जदारांचे अभिनंदन केले आणि नागरिकत्व (सुधारणा) नियम, २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये हायलाइट केली. नागरिकत्वाची मागणी करणाऱ्या १४ अर्जदारांना प्रमाणपत्रे भौतिकरित्या सुपूर्द करण्यात आली आणि इतर अनेक अर्जदारांना ईमेलद्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र जारी करण्यात आले. ११ मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा