जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना गुरुवारी भारतीय लष्कराने कंठस्नान घातले. दहशतवाद्यांच्या कृत्याची माहिती मिळताच सैन्य सतर्क झाले होते. दहशतवाद्यांनी सीमेवर घुसण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा दलांनी त्यांना आव्हान दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
शोधमोहिमेदरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. या चकमकीनंतर, कोणत्याही अतिरिक्त घुसखोरांची किंवा संशयास्पद हालचालींची शक्यता नाकारण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवर पोस्टकरत म्हटले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी घुसखोरीच्या संभाव्य प्रयत्नाबद्दल दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरेझ सेक्टरमध्ये संयुक्त कारवाई सुरू केली. या दरम्यान, गस्त घालणाऱ्या सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांनी त्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांनी सैनिकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैनिकांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले.
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका वेगळ्या दहशतवादविरोधी कारवाईत, ‘ऑपरेशन अखल’ अंतर्गत तीन दहशतवादी मारले गेले होते आणि एक सैनिक जखमी झाला होता. ऑपरेशन अखलमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या सहा होती.
२ ऑगस्ट रोजी, अखल वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. घनदाट जंगल क्षेत्रात सशस्त्र दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याचे गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी ही कारवाई सुरू झाली.
सोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. सुरुवातीच्या गोळीबारानंतर, रात्री काही काळासाठी ही कारवाई थांबवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली, ज्यामुळे आणखी तीन दहशतवादी ठार झाले.
हे ही वाचा :
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन
कोणीतरी तुमच्यावर खूश नाही! कोण म्हणाले मोदींना!
जम्मू-काश्मीर : वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलनात ३३ जणांचा मृत्यू!
अमेरिकेच्या भारतावरील टॅरीफची अंमलबजावणी सुरू; भारत आपल्या भूमिकेवर ठाम
या कारवाईत उच्च-तंत्रज्ञानाची देखरेख करणारी यंत्रणा आणि शक्तिशाली निमलष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की या कारवाईत निष्क्रिय केलेले अतिरेकी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या प्रॉक्सी संघटने द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) शी संबंधित होते. या गटाने यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.







