26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषवंदे भारत ट्रेन ही भारताच्या आत्मनिर्भरतेची ओळख

वंदे भारत ट्रेन ही भारताच्या आत्मनिर्भरतेची ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बनारस रेल्वे स्टेशनवरून चार नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यात वाराणसी–खजुराहो वंदे भारत एक्सप्रेसला त्यांनी प्रत्यक्ष बनारस स्थानकावरून रवाना केले, तर दिल्ली– फिरोजपूर, लखनऊ–सहारनपूर आणि एर्नाकुलम–बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना त्यांनी व्हर्च्युअली झेंडा दाखवला. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर (एर्नाकुलम येथून), केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि जॉर्ज कुरियन, फिरोजपूरहून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू तसेच लखनऊहून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत करत म्हणाले, “बाबा विश्वनाथांच्या या पावन नगरीतील सर्व काशीवासीयांना माझा प्रणाम. देव दीपावलीनंतर आजच्या दिवशीही काशीच्या विकास पर्वासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. पंतप्रधान म्हणाले की, विकसित देशांच्या प्रगतीचा सर्वात मोठा पाया म्हणजे मजबूत पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर). भारतही आता त्याच मार्गाने जलदगतीने पुढे जात आहे. रेल्वे नेटवर्क, रस्ते आणि नव्या व्यवस्थांच्या विस्तारामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे.

हेही वाचा..

अबब… नोएडात महिलेचा शिरच्छेद

मिरचीची पूड फेकणाऱ्या चोरट्या महिलेला सोनाराने १७ थपडा मारल्या

विचारवंत, संघटक आणि कर्मयोगी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी

आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा सोडवण्यासाठी आयसीसीकडून समिती स्थापन

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशात आता १६० हून अधिक वंदे भारत गाड्या धावत आहेत. या गाड्या भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत. “वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीची पायाभरणी करत आहेत. वंदे भारत ही भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेली ट्रेन आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारतातील तीर्थयात्रा फक्त धार्मिक नसून देशाच्या आत्म्याला जोडणारी परंपरा आहे. प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, चित्रकूट, कुरुक्षेत्र यांसारखी पवित्र स्थळे आता वंदे भारत नेटवर्कशी जोडली जात आहेत, ज्यामुळे श्रद्धा आणि विकास यांचा संगम घडत आहे.

त्यांनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत उत्तर प्रदेशात तीर्थाटन आणि पर्यटनामुळे आर्थिक क्रियाकलापांना नवी गती मिळाली आहे. गेल्या वर्षी ११ कोटी भक्तांनी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले, तर अयोध्येत राममंदिर उभारल्यानंतर ६ कोटींहून अधिक लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला असून लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. पंतप्रधान म्हणाले की, काशी आता आरोग्यसेवांच्या क्षेत्रातही पूर्वांचलची ‘हेल्थ कॅपिटल’ बनली आहे. पूर्वी रुग्णांना उपचारांसाठी मुंबईला जावे लागे, पण आता शहरातच अत्याधुनिक रुग्णालये, कर्करोग केंद्रे, आयुष्मान भारत आणि जनऔषधि केंद्रांमुळे लोकांना मोठी सोय झाली आहे.

ते म्हणाले, “काशीत राहणे, काशीला येणे आणि येथे जीवन जगणे – हे आता सर्वांसाठी एक खास अनुभव बनले आहे.” पंतप्रधानांनी सांगितले की शहरात रस्ते, गॅस पाइपलाइन, स्टेडियम आणि रोपवे यांसारखे अनेक मोठे प्रकल्प जलदगतीने पूर्ण होत आहेत. आपल्या भाषणात मोदींनी काशीच्या मुलांच्या प्रतिभेचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की वंदे भारत गाड्यांच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी “विकसित भारत” या विषयावर सुंदर कविता आणि चित्रे सादर केली. “काशीचा खासदार म्हणून मला अभिमान आहे की माझ्या शहरातील मुले इतकी प्रतिभावान आहेत. मी इच्छितो की या मुलांचा कविसंमेलन काशीमध्ये आयोजित करण्यात यावा आणि काही मुलांना देशभर नेऊन त्यांची कला दाखवली जावी.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, “विकसित भारताच्या निर्मितीत काशीची भूमिका अग्रणी असेल. आपण काशीची ऊर्जा आणि गती कायम राखली पाहिजे, म्हणजेच भव्य आणि समृद्ध काशीचे स्वप्न साकार होईल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा