30 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरविशेष“कासवांचं स्वर्ग – कोकणातील सुंदर वेळास गाव!”

“कासवांचं स्वर्ग – कोकणातील सुंदर वेळास गाव!”

Google News Follow

Related

कल्पना करा, आपण पहाटेच वेळासच्या किनाऱ्यावर उभे आहोत. हलकीशी गार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येतेय. समोर अथांग पसरलेला अरबी समुद्र. लाटांचा मंद आवाज आणि आकाशात हळूहळू उजाडत चाललेलं सोनसळी प्रकाशाचं चित्र…

कोकणातील प्रत्येक गाव सुंदर असतं… पण वेळास… वेळास हा फक्त एक गाव नाही… हा एक अनुभव आहे… एक भावना आहे… जी एकदा मनात बसली, की आयुष्यभर विसरता येत नाही…

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेलं हे छोटंसं गाव. नारळ-सुपारीच्या बागांनी वेढलेलं. साधं, शांत आणि अगदी मनाला भिडणारं.

पण या गावाची खरी ओळख काय आहे माहितेय…?

“वेळास कासव महोत्सव”…!

दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा. निसर्ग आणि संवर्धनाचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा.

आणि म्हणूनच वेळासला “कासवांचं गाव” असंही प्रेमानं म्हणतात.

इथे येणाऱ्या प्रत्येकाला फक्त समुद्रकिनारा नाही दिसत. तर दिसतो एक जिवंत चमत्कार. लहानशा ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे होणारा पहिला प्रवास.

तो क्षण. तो अनुभव. शब्दांत सांगता येणारा नाही. फक्त जगता येणारा आहे.

दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान इथे निसर्गाचा असा एक सोहळा रंगतो. की तो पाहताना आपण शब्दच हरवून बसतो. कारण हा फक्त महोत्सव नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे. जिवंत अनुभव आहे आणि आपण आहोत त्या क्षणाच्या अगदी जवळ. थोड्याच वेळात स्वयंसेवक हळूच वाळूतला एक भाग उघडतात. सगळीकडे शांतता पसरते. कुणीही आवाज करत नाही. सगळ्यांच्या नजरा एका ठिकाणी खिळलेल्या आणि अचानक वाळू हलायला लागते. लहानसं डोकं बाहेर येतं आणि मग एक… दोन… तीन… असं करत डझनभर छोट्या कासव पिल्लांचा जन्म आपल्या डोळ्यांसमोर होतो. तो क्षण तो क्षण शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. कारण आपण फक्त पाहत नाही आहोत. आपण निसर्गाचा जन्म पाहतोय.

हीच ती ऑलिव्ह रिडले कासवं. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेली. समुद्राच्या अथांग पाण्यातून मार्ग शोधत. अनेक वर्षांनी पुन्हा याच किनाऱ्यावर परतलेली. का…? कारण हाच त्यांचा जन्मस्थान. हाच त्यांचा पहिला श्वास आणि म्हणूनच मादी कासव रात्रीच्या शांत अंधारात इथे येते. वाळूत खड्डा खणते. १०० ते १५० अंडी घालते आणि एकदाही मागे वळून न पाहता पुन्हा समुद्रात निघून जाते. आई म्हणून ती आपल्या पिल्लांना कधीच पाहत नाही. हे ऐकून मन थोडंसं हेलावून जातं. पण निसर्गाची हीच तर रचना आहे.

आता आपण जे पाहतोय. ते त्या ४५-५० दिवसांच्या प्रतीक्षेनंतरचं फळ आहे. ही लहानशी पिल्लं. अगदी नाजूक. पण जिद्दीने भरलेली. त्यांना काहीच माहिती नाही. पण तरीही त्यांचा एकच उद्देश आहे. समुद्र… ते वाळूतून बाहेर पडतात. आणि सरळ समुद्राकडे धाव घेतात. पण हा प्रवास सोपा नाही. वर आकाशात पक्षी फिरतायत. बाजूला खेकडे आणि आजूबाजूला अनेक धोके. म्हणूनच इथे असलेले स्वयंसेवक आणि आपण सगळे… शांतपणे उभे राहून त्यांना सुरक्षित मार्ग देतो. कोणीही स्पर्श करत नाही. फ्लॅश नाही. आवाज नाही. फक्त एक शांत, भावनिक क्षण. आणि मग ती छोटी पिल्लं पहिल्यांदाच लाटांना स्पर्श करतात. लाट त्यांना अलगद घेऊन जाते आणि त्या विशाल समुद्रात त्यांचा प्रवास सुरू होतो.

तो क्षण पाहताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. डोळ्यात नकळत पाणी येतं. कारण आपण एका छोट्या जीवाचा संघर्ष, त्याची सुरुवात आणि त्याची आशा पाहतोय आणि तेव्हाच लक्षात येतं. हा महोत्सव फक्त पर्यटन नाही. हा एक संदेश आहे निसर्ग वाचवण्याचा. ही सगळी सुरुवात झाली २००८ साली. “सह्याद्री निसर्ग मित्र” आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला. पूर्वी ही अंडी सुरक्षित नव्हती. प्राणी, माणसं, अनेक कारणांनी ती नष्ट होत होती. पण आज हीच अंडी जपली जातात. सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात आणि योग्य वेळी ही पिल्लं समुद्रात सोडली जातात. म्हणूनच वेळास आज संपूर्ण देशात ओळखलं जातं.

आता जरा आपण गावात फिरूया. छोट्या छोट्या घरांची रांग. अंगणात रांगोळ्या. कौलारू घरे आणि प्रत्येक घरात एक आपुलकी. इथे मोठे हॉटेल्स नाहीत. इथे आहेत “होमस्टे”. म्हणजेच गावकऱ्यांच्या घरात राहण्याचा अनुभव. स्वच्छ खोली, साधी व्यवस्था. पण मनापासून केलेला पाहुणचार. सकाळी उठल्यावर गरम चहा. दुपारी घरगुती जेवण. संध्याकाळी नाश्ता आणि रात्री पुन्हा गावरान जेवण. आणि काय चव असते माहितेय…? सुरमईचं कालवण. बांगडा फ्राय. सोलकढीचा घोट. तांदळाची भाकरी. वा…! शब्द कमी पडतात. प्रति व्यक्ती साधारण १००० ते १५०० रुपयांत हा सगळा अनुभव मिळतो. आणि खरं सांगू. त्या पैशापेक्षा कितीतरी जास्त समाधान मिळतं.

आणि फक्त कासव नाही. आजूबाजूला इतकी सुंदर ठिकाणं आहेत. बाणकोट किल्ल्यावरून दिसणारा समुद्र. हर्णे बंदराचा गजबजलेला मासळी बाजार. श्रीवर्धनचा शांत किनारा. हरिहरेश्वरचं मंदिर. केळशीचा निवांत बीच आणि अंजर्लेचा कड्यावरचा गणपती. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं.

आता प्रश्न येतो. इथे कसं यायचं…?
मुंबईहून माणगाव – मंडणगड – वेळास… पुण्याहून ताम्हिणी घाटातून… रेल्वेने माणगाव किंवा खेड… आणि पुढे रस्ता… प्रवास थोडा लांब आहे. पण प्रत्येक वळणावर दिसणारा निसर्ग. तो प्रवासच खास बनवतो. स्वतःची गाडी असल्यास उत्तमच.

आणि हो… इथे येताना काही गोष्टी लक्षात ठेवा. कासवांना स्पर्श नाही. फ्लॅश नाही. आवाज नाही. प्लास्टिक नाही. कारण आपण पाहुणे आहोत आणि हा त्यांचा संसार आहे…

आणि शेवटी. आपण पुन्हा त्या समुद्रकिनाऱ्यावर उभे आहोत. सूर्य मावळतोय.आकाश केशरी झालंय आणि पुन्हा काही पिल्लं समुद्राकडे जातायत. तोच संघर्ष. तीच जिद्द आणि मनात एकच विचार येतो. “जीवन असंच असतं. पुढे जात राहायचं…”

मित्रा… वेळास कासव महोत्सव ही फक्त ट्रिप नाही. हा एक अनुभव आहे. एक जादू आहे. एक भावना आहे. जी एकदा अनुभवली की आयुष्यभर सोबत राहते. यावर्षी एकदा तरी वेळासला जा आणि त्या छोट्या पावलांनी समुद्राकडे धावणाऱ्या पिल्लांसोबत. तुमचं मनही एक नवीन प्रवास सुरू करेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा