24 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषऑस्ट्रेलियाच्या साम्राज्यावर भारतीय वादळ!

ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्यावर भारतीय वादळ!

विराट कोहलींचं कौतुक

Google News Follow

Related

भारतीय महिला संघाने दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि खेळावरील प्रेम पाहून विराट कोहलीही थक्क झालेत!
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर केलेल्या ऐतिहासिक विजयाचं कोहलींनी सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.

“ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली प्रतिस्पर्ध्यावर आमच्या संघाचा विजय जबरदस्त आहे. मुलींनी धावांचा पाठलाग अत्यंत आत्मविश्वासाने केला. जेमिमाचा खेळ मोठ्या सामन्यात अप्रतिम होता — हा विश्वास आणि जिद्दीचा खरा नमुना आहे. शाब्बास टीम इंडिया!” — असं विराट कोहली यांनी एक्स (माजी ट्विटर) वर लिहिलं.


डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई —
सात वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने ३३८ धावांवर रोखलं आणि त्यानंतर ४८.३ षटकांत ५ विकेट राखून ऐतिहासिक विजय मिळवला.

२००५ आणि २०१७ नंतर भारताने तिसऱ्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे!
२ नोव्हेंबरला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


ऑस्ट्रेलियासाठी फोएबे लिचफिल्ड हिने ९३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह ११९ धावा झळकावल्या, तर एश्ले गार्डनरने ६३ धावांचं योगदान दिलं.
भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले.

धावांच्या पाठलागात भारताने ५९ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या, पण तिथून जेमिमा रोड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयाचा पाया रचला.

दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी करत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूला झुकवलं.
हरमनप्रीतने ८८ चेंडूत १० चौकारांसह ८९ धावा केल्या, तर जेमिमाने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावा ठोकत “मॅचविनर” ठरली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा