29 C
Mumbai
Tuesday, January 6, 2026
घरविशेषगंगोत्री-हर्षिल परिसरात युद्धपातळीवर बचाव मोहिम

गंगोत्री-हर्षिल परिसरात युद्धपातळीवर बचाव मोहिम

१०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील धराली भागात नैसर्गिक आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाचे डीआयजी (ऑपरेशन्स) बरिंदरजीत सिंह यांनी सांगितले की, ITBP च्या पाच टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून त्यापैकी सध्या तीन टीम बचाव मोहिमेत कार्यरत आहेत. हर्षिल आणि गंगोत्री भागात ही टीम मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

आयएएनएसशी बोलताना डीआयजी बरिंदरजीत सिंह म्हणाले की, “रात्रीच्या काळात सुमारे ११० लोकांना वाचवण्यात आले आहे, ज्यामध्ये पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकही आहेत. यापैकी काहींना गंगोत्री धामकडे पाठवण्यात आले असून, जखमींना प्राथमिक उपचार देऊन ITBP च्या पोस्टवर आणण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, “बुधवारी सकाळपासून युद्धपातळीवर ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. हर्षिलमध्ये हवाई बचावकार्य (एअर रेस्क्यू) सुरू झाले आहे. सुमारे पाच जखमींना वाचवण्यात यश आले आहे. दुसरीकडे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तात्पुरते पूल उभारले जात आहेत. काही बीआरओच्या (सीमा रस्ते संघटना) यंत्रसामग्रीही सीमावर्ती भागातून येथे आणण्यात आली आहे. काही लोक डोंगराच्या दिशेने सुरक्षिततेसाठी गेले होते, त्यांचाही शोध घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे.”

हेही वाचा..

विरोधी पक्षाला संसद चालू ठेवायचीच नाही

खालिद का शिवाजी : इतिहासाचे विकृत चित्रण

एफॲण्डओ एक्सपायरीवर बंदी घालण्याचा विचार नाही

तायवानजवळ चीनची लष्करी हालचाल

डीआयजी यांनी सांगितले की, सध्या सुमारे ७ लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ४ जणांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला आहे. ते म्हणाले की, “हवामानाचा अंदाज असतो, परंतु नक्की काय परिणाम होईल हे सांगणे कठीण असते. आमची फोर्स सतत सतर्क असते. सातत्याने पावसाचा अंदाज होता, पण ढगफुटी होईल, याचा अंदाज कोणालाही घेता आला नाही.”

डीआयजी बरिंदरजीत सिंह म्हणाले की, “बचाव कार्यात पाऊस ही मोठी अडचण ठरत आहे. हवामान प्रतिकूल असल्यामुळे टीमला अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान अनुकूल राहिल्यास ऑपरेशन वेगाने होईल, पण पुढेही पावसाचा अंदाज असल्यामुळे हवाई बचाव मोहीम थांबू शकते. सीमावर्ती भागातील परिस्थितीबद्दल बोलताना डीआयजी यांनी स्पष्ट केले की, भारत-चीन सीमारेषेवर सध्या कोणतीही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. आपत्तीचा प्रभाव मुख्यत्वे घाटी क्षेत्रात आहे, जिथे काही ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत आणि अडथळे निर्माण झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा