32 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरराजकारणनिवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

Google News Follow

Related

२ मे रोजी देशभर झालेल्या पाच विधानसभा निवडणूकांचे निकाल लागणार आहेत. पण या पाचही राज्यात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाने निकाला आधीच रणांगणातून पळ काढला आहे. विधानसभा निकालांवर विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत असे फर्मान काँग्रेसने काढले आहे.

हे ही वाचा:

डंका बजने लगा

२८ वर्षीय ऋग्वेद कुलकर्णीचे कोरोनामुळे निधन

जल्दी लगा दे सुई…

भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस

स्पुतनिक-वी भारतात दाखल

मार्च-एप्रिल या दोन महिन्यात झालेल्या पाच विधानसभा निवडणूकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. आज २ मे रोजी या निवडणूकांचे निकाल लागत आहेत. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांपासून ते राज्यपातळीवरच्या वाहिन्यांपर्यंत सर्व ठिकाणी या निकालांवर चर्चा होत आहे. पण या कुठल्याही चर्चे काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झालेले नाहीत. यासाठी पक्षातर्फे कोरोना महामारीचे कारण दिले गेले असले, तरिही कुठल्याच राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या एग्झिट पोल्समध्येही काँग्रेस कुठेच समाधानकारक कामगिरी करताना दिसत नव्हती.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. तर त्यानंतर लगेचच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत पक्षाचे प्रतिनिधी वाहिन्यांवरिल चर्चेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा