भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी राष्ट्रीय जनता दल (राजद)चे नेते तेजस्वी यादव यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले, “त्यांच्याकडे ५६ इंची जीभ आहे, पण आमच्याकडे ५६ इंची छाती आहे.” त्यांनी पुढे म्हटले, “फक्त निवडणुका आल्यात म्हणून काहीही बोलत आहेत, गोंधळ निर्माण करत आहेत; पण बिहारची जनता एनडीएसोबत ठाम उभी आहे आणि पुन्हा एकदा एनडीएच बिहारमध्ये सरकार बनवणार आहे.”
रविवारी माध्यमांशी संवाद साधताना तिवारींनी तेजस्वी यादवांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “राजद नेहमीपासूनच लोकांना दिशाभूल करत आहे. वक्फ बोर्ड विधेयक बिहार विधानसभेत पास झाले का? नाही, ते संसदेत पास झाले आणि तेथे ते बहुमताने मंजूर झाले. तरीदेखील जर ते लोकांना खोटं सांगत असतील, तर तो त्यांचा स्वतःचा फसवणुकीचा खेळ आहे.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही सत्तेत होता, तेव्हा गुन्हेगारांचे राज्य होते. आजही हे लोक शहाबुद्दीनचा जयजयकार करतात — जो बिहारचा शत्रू आहे, हे राज्यातील प्रत्येक मूल जाणते.”
हेही वाचा..
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन सेशेल्सकडे रवाना
ब्लिंक इट, ओला आणि उबेरमध्ये बांगलादेशी घुसखोर!
बिहार: भाजपा खासदाराकडून १० कोटींची खंडणी; मुलाला जीवे मारण्याची धमकी!
छठ पूजाः खरना पूजेसाठी पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!
तेजस्वी यादवांवर टीका करत तिवारी म्हणाले, “त्यांच्याकडे ५६ इंची जीभ आहे, आमच्याकडे ५६ इंची छाती आहे. जितकं बोलायचं आहे ते बोलू द्या. त्यांची ओळख म्हणजे जंगलराज, नोकरीच्या बदल्यात जमीन घेणे आणि बिहारची लूट करणे — हे संपूर्ण जग जाणतं. त्यांच्या मोठ्या भावाने, तेज प्रताप यादवांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. जे स्वतःच्या भावाला संभाळू शकले नाहीत, ते बिहारचं काय चालवणार?”
तिवारी पुढे म्हणाले, “निवडणुकीत प्रत्येकजण आपली भूमिका मांडतोच, पण बिहार आता बदलत आहे. एनडीए मोठे पूल, महामार्ग, एम्स, विमानतळ उभारत आहे; महिलांसाठी रोजगार योजना, १२५ युनिट मोफत वीज आणि भविष्याची स्पष्ट दृष्टी ठेवून विकासाचं काम करत आहे.” भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, “बिहारची जनता महागठबंधनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये फसणार नाही. बिहारची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख एनडीए सरकार बनवणार आहे.”







