प्रवाशांना आता घरबसल्या मोबाइल ॲप (UTS) द्वारे तिकिटे बुक करता येतील. घरी किंवा कार्यालयात बसून लोकल ट्रेनची तिकिटे खरेदी करता येतील.
हे ही वाचा:
नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध
संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू
मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत
राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी
स्मार्टफोनच्या वापराने स्टेशन पासून किमान ३० मीटर दूर आणि बोर्डिंग स्टेशनपासून २ किलोमीटरच्या आत असल्यावरच तिकीट बुक करता येईल. हे सिस्टीम फोनचे जीपीएस निर्देशांकांचा वापर करते . तिकीट न खरेदी करून कोणीही रेल्वेची फसवणूक करू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिओ-फेन्सिंगच्या समस्यांमुळे ज्यांना तिकीट बुक करण्यास त्रास होतो ते अँपवरील QR कोड पर्यायावर क्लिक करू शकतात. “मला हे सुनिश्चित करायचे आहे की ॲप आणखी सरलीकृत केलं जावं जेणेकरून त्याचा वापर वाढेल. बुकिंग ऑफिस मधली गर्दीही कमी करण्याकरीता ह्याची मदत होईल “, मध्य रेल्वे मुंबई विभागाचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल म्हणाले. लोकांना घरबसल्या UTSonmobile ॲपवर तिकीट बुक करण्याची परवानगी देण्यात काही गैर नाही असे मध्य रेल्वेला वाटते. आता मध्य रेल्वेकडे ४७६ एटीव्हीएम आहेत, ज्यात १७८ फॅसिलिटेटरद्वारे चालवले जातात आणि ३३६ बुकिंग विंडो आहेत. परंतु सर्व सुरळीतपणे काम करत नाहीत. सध्या मध्य रेल्वेमध्ये ३८ लाख प्रवासी आहेत जे महामारीपूर्वीच्या आकडेवारीपेक्षा अंदाजे 7 लाख कमी आहेत….सध्या मध्य रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी ३८ लाख आहेत, कोरोना महामारीच्या तुलनेत ही संख्या ७ लाखांनी कमी आहे. जवळपास २५ टक्के तिकिटे एटीव्हीएम द्वारे आणि ७ टक्के UTSonmobile ॲपद्वारे बुक केली जातात. गोयल पुढे म्हणाले की, ते सेंट्रल रेल्वेला प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याविषयी आग्रही राहणार आहेत. प्रथम श्रेणी तसेच एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना एकापेक्षा अधिक तिकिटे उपलब्ध होतील याची काळजीही घेण्याची विनंती करणार आहे.
राहुल निकम, ठाणे रहिवासी म्हणाले, “त्यांनी अशा प्रकारची बंधने प्रथम घातली नसावीत. जर तुम्ही लोकांसाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान आणले, तर तुम्ही त्याचा वापर लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरीही, कधीही न करण्यापेक्षा उशीर झालेला चांगला आहे. “.