32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरअर्थजगतराज्यात लसीकरण मोहीमेचे तीन तेरा

राज्यात लसीकरण मोहीमेचे तीन तेरा

Google News Follow

Related

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्र हा देशाची कोरोना राजधानी बनली, आता कोविड लसीकरणाबाबतही  ठाकरे सरकारचे राजकारण सुरू आहे, आऱोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाबाबत सरकारची चालढकल सुरू असून  देशात लसीकरणाच्या यादीत  महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आला आहे, या ढील्या कारभाराची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे.

ठाकरे सरकारच्या अजब-गजब कारभारामुळे कोविड मृत्युदराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ‘नंबर १’ आहे. पण जेव्हा लसीकरणाची वेळ आली तेव्हा मुंबईसह सर्व राज्यात ही मोहिम मंद गतीने सुरू आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी मुंबईत फक्त १३ लोकांना तर राज्यात फक्त १८१ लोकांनाच कोविड लस देण्यात आली. या आकडेवारीसह लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानावर आहे.

“राज्याचा मृत्युदर आजही २.५४% आहे. सध्या देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे तरी आजही देशातील ४२% रुग्ण हे केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात आहेत. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवायची गरज होती. परंतु फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करत आहे.” असा हल्लाबोल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. ठाकरे सरकारने या अकार्यक्षमतेला जबाबदार धरून आरोग्यमंत्री टोपे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

१९ जानेवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार कर्नाटक राज्य लसीकरणाच्या बाबतीत क्रमांक १ ला आहे. कर्नाटकमध्ये ८०,६८६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. दोन नंबरला असणाऱ्या तेलंगणात ६९,४०५  लोकांना लस दिली गेली आहे, तर ५८,४९५ या लसीकरणाच्या आकड्यासह आंध्रप्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रात ३०,२४७ लोकांना लस देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा