मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी नव्याने लागू करण्यात आलेल्या वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शनांच्या आडून हिंदू समुदायाविरोधात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, तोडफोड, जाळपोळ झाली.
OpIndia ने सविस्तरपणे यासंदर्भातील अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, कशा प्रकारे हिंदूंना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले. त्यांची घरे, दुकाने आणि मंदिरे यांच्यावर हल्ले करण्यात आले. ११ एप्रिल रोजी जुम्मा नमाज नंतर या नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात ‘निदर्शनांच्या’ नावाखाली ही दंगल सुरू झाली आणि १२ एप्रिलपर्यंत चालू राहिली.
परिस्थिती इतकी बिकट झाली की हजारो हिंदूंना आपल्या घरातून पळून जाऊन नौकांद्वारे जवळच्या मालदा जिल्ह्यात आश्रय घ्यावा लागला. २२ एप्रिल रोजी पत्रकारांच्या टीमने हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादला भेट दिली आणि त्या हिंदू कुटुंबांना भेटले ज्यांनी या मुस्लीम जमावाच्या हिंसाचारात सर्व काही गमावले. पीडितांनी खून, हिंदू मंदिरे आणि घरांवरील हल्ले आणि दंगल घडवून आणण्यात मशिदींच्या भूमिकेच्या हृदयद्रावक कहाण्या सांगितल्या.
त्यांनी स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेचा, तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकांच्या हिंसाचारातील सहभागाचा आणि पक्षीय ओळख काहीही असली तरी उन्मादी मुस्लीम जमावाने कोणतीही तमा न बाळगता हल्ला केल्याचे अधोरेखित केले. सर्वांनी एकमुखाने १ मे रोजी यूट्यूबवर प्रकाशित ३० मिनिटांच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये सांगितले की, त्यांची हिंदू ओळख हीच हल्ल्याचे कारण होती. पारुल दास यांनी सांगितले की मुस्लीम जमावाने तिच्या पती व मुलाचा खून केला, पोलीस ४ तासांनी आले. टीमने हरगोबिंदो दास यांच्या कुटुंबाला भेट दिली. हरगोबिंदो दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांचा ११ एप्रिल रोजी मुस्लीम जमावाने नृशंस खून केला.
या खुनाच्या प्रकरणात कालू नदर, दिलदार नदर, इंझमाम उल हक आणि जियाउल शेख या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हरगोबिंदो दास यांच्या पत्नी पारुल दास यांनी सांगितले, “सुरुवातीला त्यांनी दुकान फोडले. सर्व काही लुटले आणि निघून गेले. नंतर परत आले आणि आमचे स्वयंपाकघर उद्ध्वस्त केले. त्यांनी आमच्या छपरावर दगड, काच, बाटल्या फेकल्या. कुंपणाच्या पलीकडून दगड, विटा फेकल्या. तिसऱ्यांदा आले तेव्हा हातात फावडे, कुदळ आणि इतर धारदार शस्त्रे होती.”
हे ही वाचा:
पहलगाम हल्ल्यासाठी सपा नेते पाकिस्तानला क्लीन चिट देतायेत!
बडगाममधून दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक!
भारत बनेल जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था
स्वतःहून अमेरिका सोडत असाल, तर १,००० डॉलर्स देऊ!
तिने सांगितले की, तिच्या पती व मुलाला ओढून बाहेर काढून निर्घृणपणे ठार मारले. “वडील आणि मुलगा तेथे उभे होते. त्यांनी त्यांना ओढून बाहेर काढले. वडिलांना नाल्याजवळ ठार मारले. माझ्या मुलाला त्या झाडाखालीच ठार मारले.”
पोलिसांनी काही मदत केली का? असे विचारले असता पारुल दास म्हणाल्या, “नाही, काही नाही. पोलिस असते तर तिसऱ्यांदा खून झाला नसता. ते (पोलीस) ४ तासांनी आले. ती असहाय्य महिला म्हणाली की, तिने टीव्हीवर दाखवलेल्या दृश्यांमधून गुन्हेगारांना ओळखले. ती म्हणते की, आम्ही दहशतीखाली आहोत. आम्हाला बीएसएफ कॅम्पमध्ये जायचे आहे.
पारुल दास यांनी सांगितले की, आता त्या आपल्या घरी राहू शकत नाहीत कारण घराचे दरवाजेच उरलेले नाहीत. “माझ्या पती व मुलाचा खून का झाला? मी काय सांगू? आमचा कोणाशी वैर नव्हते. अलीकडेच पारुल दास आणि त्यांच्या सून पिंकी दास यांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी त्रास दिला आहे.
तृणमूल नगरसेवकाचा सहभाग
दीपेन मंडल या हिंदू व्यक्तीने सांगितले की, या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस नगरसेवकाचा सहभाग होता. “नगरसेवक उपस्थित होता. त्याने वाटले असते तर तो हल्ला थांबवू शकला असता, असे मंडलने सांगितले. “आमिरुल (शमशेरगंजचे TMC आमदार) तिथे आला होता. त्याला सर्व माहिती होती. तो आल्यावर या बाजूने हल्ला झाला. त्याच्यासोबत असलेल्यांनीही तोडफोड व लुटीत भाग घेतला,” असे त्यांनी सांगितले.
मंडल पुढे म्हणाले, “नगरसेवकाला माहिती नसती तर गावकरी येथे येऊन कसे हल्ला करू शकले? मेहबूब आलम आहे. त्याच्या गावातून लोक येथे येऊन आमच्या गावावर हल्ला करत आहेत. त्याने त्यांना ‘नाही’ सांगितले असते तर ते आले नसते.”
त्यांनी सांगितले की पोलिसांनी त्यांना मालदामधून हाकलून पुन्हा मुर्शिदाबादला पाठवले. “आम्हाला जबरदस्तीने पाठवले…पोलिस म्हणाले की ते आमच्यावर खटले दाखल करतील. त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला येथे ठेवू शकत नाही. आम्हाला काढून टाकण्यासाठी अनेक सबबी दिल्या.
त्यांनी असेही सांगितले की, मुस्लीमांनी मंदिरात घुसून ते फोडण्याचा प्रयत्न केला आणि जवळील दुकानातही घुसण्याचा प्रयत्न केला. हिंदू महिला बनवासी मंडल यांनी दु:ख व्यक्त केले, “बीएसएफ कॅम्प हवा आहे. बनवासी मंडल म्हणाल्या, “येथे बीएसएफ कॅम्प असेल तर आमचे आयुष्य थोडे सुसह्य होईल. आम्हाला झालेल्या नुकसानीचे नुकसानभरपाई हवी आहे. घरी काहीच नाही. भात नाही, डाळ नाही, अंगावर घालायला काही नाही. सर्व काही राख झाले आहे.”
मुस्लीम मंदिरासमोर थुंकले, लघवी केली
झरना मंडल या हिंदू महिलेनं सांगितले की १२ एप्रिल रोजी मुस्लीम जमावाने तिच्या जावयावर हल्ला केला आणि मंदिराची तोडफोड केली. त्या म्हणाल्या की जमावाने मंदिरासमोर थुंकले आणि लघवी केली. त्यांनी मंदिरासमोर थुंकले आणि लघवी केली…किमान २००० ते ५००० लोक आले आणि या मंदिराची तोडफोड केली…शनिवारी हे मंदिर फोडले,” असे त्या म्हणाल्या.