पाक सैन्यावर टीटीपीचा हल्ला; ११  सैनिकांचा मृत्यू!

टीटीपीचे १९ जण मारले गेले 

पाक सैन्यावर टीटीपीचा हल्ला; ११  सैनिकांचा मृत्यू!

पाकिस्तानच्या लष्करावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि मेजरसह ११ सैनिक ठार झाले आहेत. हा हल्ला खैबर पख्तूनख्वाच्या ओरकझाई प्रांतात झाला. पाकिस्तान तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा दलांनी ७-८ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या सीमेवरील प्रांतातील ओरकझाई जिल्ह्यात “फितना अल-खवारीज” च्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीवरून ही कारवाई केली. या दरम्यान, बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे १९ दहशतवादीही मारले गेले.

”फितना अल-खवारीज” हा शब्द बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी गटाला सूचित करतो. निवेदनात म्हटले आहे की सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. परिसरात उर्वरित अतिरेक्यांना संपवण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे, असेही त्यात म्हटले आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना

भारत हा जगाचा विश्वासार्ह भागीदार

ज्योती सिंह यांची मुख्यमंत्री योगींकडे न्यायाची मागणी

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी आसाम पोलिसात डीएसपी असलेल्या चुलत भावाला अटक!

सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज (CRSS) च्या अहवालानुसार, २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत खैबर पख्तूनख्वा हा सर्वाधिक प्रभावित प्रदेश ठरला. या कालावधीत देशभरात झालेल्या हिंसाचाराशी संबंधित एकूण मृत्यूंपैकी सुमारे ७१ टक्के (६३८) मृत्यू आणि ६७ टक्क्यांहून अधिक (२२१) हिंसक घटना केवळ या प्रांतात नोंदवल्या गेल्या आहेत.

Exit mobile version