देशात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे यशस्वी पार पडले आहेत. तर, उर्वरित टप्प्यांसाठीची गडबड सध्या सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणुकीदरम्यान देशातील काही मतदारसंघांकडे मात्र सगळ्यांचे विशेष लक्ष आहे. काही लोकसभा मतदारसंघातील लढती या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर काही समाजकंटकांनी गोंधळ करून तोडफोड केल्याची माहिती समोर अली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
उत्तर प्रदेशमधील अमेठीच्या गौरीगंज येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. कार्यालयाबाहेर काही गाड्या उभ्या होत्या. त्याचवेळी काही समाजकंटक तिथे आले आणि त्यांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या अज्ञात व्यक्ती नशेमध्ये होते, अशी माहिती आहे. या घटनेच्या वेळी कार्यालयाच्या आत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बाहेर तोडफोडीचा आवाज ऐकून ते बाहेर आले पण, तोपर्यंत सहा ते सात गाड्यांची तोडफोड झालेली होती.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पळवून लावलं. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा जोरदार विरोध केला. तसेच त्यांनी पोलिसांनाही या बद्दल कळवलं आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
उत्तर प्रदेशातील अमेठीच्या निकालाकडे लक्ष असणार आहे. काँग्रेसचा हा परंपरागत लोकसभा मतदारसंघ असून सध्या इथून भाजपाच्या स्मृती इराणी खासदार आहेत. राहुल गांधी या मतदरासंघातून निवडणूक लढवायचे. मात्र, आता ते रायबरेलीमधून उभे आहेत. राहुल गांधी अमेठीमधून उभे राहिले असते, तर ही लढाई आणखी प्रतिष्ठेची बनली असती. अमेठीमध्ये आता भाजपाकडून स्मृती इराणी तर काँग्रेसकडून किशोरी लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.