33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषदिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

अज्ञात वाहनाने दिली धडक

Google News Follow

Related

दिल्ली-मुंबई द्रुतगती भीषण अपघात झाला आहे.सवाई माधोपूर जिल्ह्यातील बौनली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रणथंबोर येथील गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात कारने जोरदार धडक दिली आहे.या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.तर दोघे जण जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(५ मे) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेशजीच्या दर्शनासाठी एक कुटुंब कारमधून जात होते. त्याचवेळी बाउली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास पुलियाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.याशिवाय कारमधील दोन मुलेही गंभीर जखमी झाली आहेत.

हे ही वाचा:

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह

अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.अपघातग्रस्त व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते राजस्थानमधील सीकर येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.तसेच कारला कोणत्या वाहनाने धडक दिली हे अद्याप समोर आलेले नाही.याचा तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा