उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील एका तरुण मुस्लिम महिलेनं हिंदू धर्म स्वीकारून आपल्या हिंदू जोडीदाराशी विवाह केला आहे. विवाहाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची स्थानिक पातळीवर मोठी चर्चा होत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना बिनावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. यापूर्वी नूर बी म्हणून ओळखली जाणारी ही मुस्लिम महिला स्वतःच्या इच्छेने सनातन धर्म स्वीकारून राजकुमार कश्यप यांच्याशी विवाहबंधनात अडकली. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांच्या प्रेमात होते. धार्मिक धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिनं आपलं नाव ‘माही कश्यप’ असं ठेवले.
या घटनेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हे दोघे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते; मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी या विवाहाला संमती दिली नव्हती. त्यानंतर महिलेने स्वतःहून घर सोडून विवाह करण्याचा निर्णय घेतला. नियमानुसार धर्मांतर प्रक्रिया पूर्ण करून, शुक्रवार १६ जानेवारी रोजी तिनं मंदिरात पवित्र अग्नीसमोर हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेत राजकुमार कश्यप यांच्याशी विवाह केला.
हे ही वाचा:
अभिभाषणाच्या मसुद्यात चुकीचे दावे; तामिळनाडूच्या राज्यपालांचा सभात्याग
अधिकृत शंकराचार्य नसताना नाव कसे वापरता?
पेरूची साल आणि बिया म्हणजे आरोग्यासाठी वरदान! काय आहे फायदा?
आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल लक्ष? ‘हे’ घटक ठरवतील बाजाराची दिशा!
या विवाहाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, त्यात नववधू माही कश्यप स्वतः स्पष्टपणे सांगताना दिसते की तिनं कोणताही दबाव किंवा सक्ती न होता, पूर्णतः स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करून विवाह केला आहे. विवाहानंतर कुटुंबीयांकडून किंवा समाजाकडून संभाव्य धोका असल्याची भीती वाटल्याने या दाम्पत्याने स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली आहे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी लेखी अर्ज सादर केला आहे.







