भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत- नेपाळ सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी वृत्त दिले आहे. नेपाळमध्ये हिंसाचार उसळून आल्यानंतर भारताच्या सीमा रक्षक दलाने, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) दक्षता वाढवली आहे. शिवाय भारतीय हद्दीत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
नेपाळमधील वाढत्या तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भारत- नेपाळ सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सशस्त्र सीमा दल या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.
सीमेवर पुरेसे बळ तैनात करण्यात आले असून सीमा चौक्यांवर कडक तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षितता राखताना लोकांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा..
इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी
एकेटीयू दीक्षांत समारंभात शुभांशु शुक्ला यांना मानद पदवी
“मूर्तीपूजेवर बंदीचा हवाला देऊन राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान, देश फोडण्याचा प्रकार”
बलुच नागरिकांच्या हत्येनंतर मानवाधिकार संघटना संतापली
उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये १,७५१ किमी पेक्षा जास्त लांबीच्या भारत- नेपाळ सीमा भागात नागरिकांना अनिर्बंध हालचाली करता येतात. यापूर्वीही भूतकाळात नेपाळमधील अंतर्गत अशांततेच्या काळात सीमा अलर्ट जारी करण्यात आले होते. सोमवारी नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद आणि सरकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांविरुद्ध हजारो तरुणांनी संसदेत घुसून निदर्शने केल्यानंतर हालचाली वाढल्या आहेत. नेपाळ सरकारने फेसबुकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली असून दावा केला की बनावट आयडी असलेले सोशल मीडिया वापरकर्ते द्वेषपूर्ण भाषण आणि बनावट बातम्या पसरवत आहेत.







