26 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरक्राईमनामानेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेल पेटवल्याने भारतीय महिलेचा मृत्यू

नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेल पेटवल्याने भारतीय महिलेचा मृत्यू

पर्यटनासाठी नेपाळला गेल्याची माहिती

Google News Follow

Related

नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडिया वापरावर बंदी आणल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि सरकार कोसळले. नेपाळमधील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसून आंदोलक आता इमारती, हॉटेल्स यांना लक्ष्य करून जाळपोळ करत आहेत. अशातच आता काठमांडूमध्ये दंगलखोरांनी एका आलिशान हॉटेलला आग लावल्याने एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय अनेक भारतीय पर्यटक अजूनही नेपाळमध्ये अडकून पडले आहेत.

गाझियाबादमधील रामवीर सिंग गोला हे आपली पत्नी राजेश गोला यांच्यासह पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेन्यास्तही काठमांडूला गेले होते. परंतु ९ सप्टेंबरच्या रात्री हिंसक निदर्शनांदरम्यान त्यांचे वास्तव्य असलेले पंचतारांकित हॉटेल जाळण्यात आले. आंदोलन हिंसक बनल्याने विविध सरकारी आणि खाजगी प्रतिष्ठानांना आग लावली.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रामवीर गोला आणि त्यांची पत्नी राजेश गोला या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहत होते तेव्हा निदर्शकांनी खालच्या मजल्यावर आग लावली. घाबरलेल्या रामवीरने पडद्याचा वापर करून पत्नीला सुरक्षित ठिकाणी खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्यांच्या हातातून निसटली आणि पडली. राजेशला गंभीर दुखापत झाली आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा मृतदेह गाझियाबाद येथील मास्टर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आणला.

राजेश गोला यांचा मोठा मुलगा विशाल म्हणाला, “जमावाने हॉटेलमध्ये घुसून आग लावली. जिन्यांवर धूर जमा झाल्याने माझ्या वडिलांनी खिडकीची काच तोडली, चादरी बांधल्या. खाली उतरण्याचा प्रयत्न करताना माझी आई घसरली आणि तिच्या पाठीवर जोरात पडली. शिवाय विशालने आरोप केला की संपर्क खंडित झाल्यामुळे आई वडिलांचा शोध घेण्यात अडथळा येत होता. दोन दिवस आम्हाला त्यांचा पत्ता कळला नाही. शेवटी, माझे वडील एका मदत छावणीत असल्याचे समजले आणि आईचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे कळले.

हे ही वाचा : 

राहुल गांधी स्वतःला संविधानापेक्षा वरचढ समजतात!

दिल्लीत चार बांगलादेशी घुसखोर ताब्यात!

केरळमध्ये अजगराची शिकार करून मांस शिजवणाऱ्या दोघांना अटक!

ब्राझील: सत्तापालटाच्या कटासाठी माजी राष्ट्रपतीला २७ वर्षांची शिक्षा!

नेपाळमधील हिंसक निदर्शनांमुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले असून भारतीय यात्रेकरूंचे अनेक गट नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. महाराजगंजमधील भारत-नेपाळ सीमेवर वाढत्या अशांततेमुळे अनेक पर्यटकांनी त्यांचे प्रवास अर्धवट सोडले आणि परतणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा