33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाआम्ही विश्वास ठेवण्यायोग्य शेजारी आहोत; श्रीलंकेला भारताने केले आश्वस्त

आम्ही विश्वास ठेवण्यायोग्य शेजारी आहोत; श्रीलंकेला भारताने केले आश्वस्त

एस जयशंकर यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. मालदीवचा दौरा संपवून जयशंकर श्रीलंकेत पोहोचले आहेत. वीस जानेवारी रोजी त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची आज भेट घेतली. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासमोर श्रीलंकेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठीण काळात केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रातील भागीदारीवर भर देत दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला असून भारताच्या बाजूने माजी पंतप्रधान मोदी यांचा संदेश देण्यात आला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर मालदीवचा दौरा संपवून जयशंकर श्रीलंकेत पोहोचले आहेत.

वीस जानेवारी रोजी त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना भारतीय पंतप्रधान मोदींच्या शेजारील राष्ट्राचा पहिला संदेश देऊन दोन्ही देशांमधील संबंध किती दृढ आहेत याबद्दल बोलले. ते म्हणाले की, भारत हा एक विश्वासार्ह शेजारी आणि विश्वासार्ह भागीदार आहे, जो श्रीलंकेला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. काळाच्या गरजेनुसार भारत श्रीलंकेच्या पाठीशी उभा असून श्रीलंका या संकटातून ताकदीने बाहेर पडेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी  श्रीलंकेच्या मंत्र्यांशी बोलले

भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी आणि इतर मंत्र्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर केलेल्या ट्विटमध्ये जयशंकर म्हणाले की, पायाभूत सुविधा, ऊर्जा, पर्यटन, आरोग्य, दळणवळण आणि उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांच्या संयुक्त संभावनांवर चर्चा झाली. या कठीण काळात श्रीलंकेसोबत भारताची एकता व्यक्त करणे हा कोलंबोला येण्याचा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. भारत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत विशेषत: ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. भारतीय पर्यटक येथे येऊन श्रीलंकेबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. त्यांनी सुचवले की भारतीय पर्यटकांना रुपे आणि यूपीआय प्रणालीद्वारे पैसे देण्यास प्रोत्साहित करून त्यांचा प्रवास सुखकर होऊ शकतो.

भारताच्या मंत्र्याचे जोरदार स्वागत

श्रीलंकेत आगमन झाल्यावर भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्रीलंकेला मदत केल्याबद्दल श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री ‘अली साबरी’ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, भारताने अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी चार अब्ज डॉलर्सचा कर्जपुरवठा केला अस म्हंटले तर ती अतिशयोक्ती नाही. यामुळे आम्हाला संकटकाळात काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा