30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारण‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

Google News Follow

Related

शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यांतील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलताना त्रिपुरातील घटनेचे अमरावतीमध्ये पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असे वक्तव्य केले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आयुष्यभर जाती जातीत तेढ निर्माण करून विखाराचे तेल ओतणारे भाजपवर आरोप करत आहेत अशी टीका केली आहे.

‘आयुष्यभर जाती जातीत तेढ निर्माण करून विखाराचे तेल ओतणारे आणि त्यावर राजकीय पोळी भाजणारे भाजपावर आरोप करतायत,’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच ‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल,’ असेही अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये दिसले. या संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण मिळाले आणि राजकीय वर्तुळातही या घटनांना वेगळेच वळण मिळाले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या हिंसेला रझा अकादमी कारणीभूत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते. रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली होती. अतुल भातखळकर यांनीही महाराष्ट्र शांत होण्यासाठी रझा अकादमीला पोसणे बंद करा असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

काल (१८ नोव्हेंबर) मालेगाव येथील रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली होती. कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केल्याचेही वृत्त होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा