30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरदेश दुनियाअमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

Google News Follow

Related

गेल्या वर्षी सुरू झालेले शेतकरी आंदोलन आपल्या राज्यात नको. जे काही करायचे ते दिल्लीत करा, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केले आहे. त्यामुळे या आंदोलनाविषयीची त्यांची वास्तव भूमिका समोर आल्याचे म्हटले जात आहे.

अमरिंदर सिंग यांनी या आंदोलनाचे पंजाबच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचे म्हटले असून ज्यांना या आंदोलनात भाग घ्यायचा आहे त्यांनी दिल्लीत जाऊन ते करावे. पंजाबला आणि पंजाबमधील प्रशासनाला त्यापासून दूर ठेवावे, असे म्हटले आहे.

अमरिंदर सिंग यांच्या या वक्तव्यावर आता टीका होऊ लागली आहे.

ते म्हणाले की, जर तुम्हाला केंद्र सरकारवर या आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे तर तुम्ही दिल्लीत जा. तुमच्या आंदोलनाने पंजाबला त्रास देऊ नका. अमरिंदर म्हणाले की, आजही शेतकरी पंजाबात ११३ ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे पंजाबच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे.

हे ही वाचा:

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

कांदिवलीतली १६ वर्षीय मुलगी हैदराबादेत कशी सापडली?

होशियारपूर येथील मुखलियाना गावातील शासकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात अमरिंदर बोलत होते.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचा दिला सल्ला दिला आहे. किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षड्यंत्र आहे, त्याचा हा पुरावा. पंजाबात सत्ता असल्यामुळे तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा