अशा गुन्हेगारांना समाजात जगण्याचा अधिकार नाही!

न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

अशा गुन्हेगारांना समाजात जगण्याचा अधिकार नाही!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे या दोषीला न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागत केले. अशा गुन्हेगारांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हे प्रकरण “दुर्मिळातील दुर्मिळ  असल्याचे नमूद करत विशेष न्यायालयाने ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला अपहरण, क्रूर बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती आणि अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

भारताच्या १२ एलपीजी जहाजांनी टोलशिवाय ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

आरोग्य, संरक्षण ते अंतराळ क्षेत्रापर्यंत भारत- सेशेल्समध्ये १९ महत्त्वाचे करार

श्रीकांतचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा हुकले

कॅनडाची ऐतिहासिक भरारी!

न्यायालयाने २५ जून रोजी आरोपीला दोषी ठरवले होते, म्हणजेच १ मे रोजी घडलेल्या गुन्ह्यानंतर अवघ्या ६० दिवसांत निकाल देण्यात आला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला खाऊ देण्याचे आणि नवजात वासरू दाखवण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तो तिला गोठ्याजवळील एका शेडमध्ये घेऊन गेला, जिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तिचे तोंड दाबून आणि छातीवर गंभीर मारहाण करून तिची हत्या केली.

न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा निकाल न्यायव्यवस्थेच्या न्यायनिष्ठेचा आणि कठोर भूमिकेचा पुरावा आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच, तपास यंत्रणांनी विक्रमी वेळेत तपास पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Exit mobile version