25 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरराजकारण"महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल"

“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”

Google News Follow

Related

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची २१ मतं फुटल्यावर खळबळ माजली आहे. भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला असून काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

“यापुढे महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं आहे,” असं नसीम खान म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.

पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून काँग्रेसचे अनेक नेते आता दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

विधान परिषदेच्या १० जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. पाच उमेदवार भाजपाचे होते तर सहा उमेदवार महाविकास आघाडीचे होते. भाजपाच्या पाचव्या उमेदवारासाठी पुरेशी मतं नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा