25 C
Mumbai
Tuesday, February 17, 2026
घरराजकारणउत्तर प्रदेश भीतीकडून विश्वासाकडे...ना कर्फ्यू, ना दंगली!

उत्तर प्रदेश भीतीकडून विश्वासाकडे…ना कर्फ्यू, ना दंगली!

योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केले वक्तव्य

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की राज्य ‘फियर झोन’मधून ‘फेथ झोन’मध्ये परिवर्तित झाले आहे. “ना कर्फ्यू आहे, ना दंगल;  यूपीमध्ये सर्व काही उत्तम आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांप्रती कथित अवमानकारक वर्तन लोकशाही परंपरांविरुद्ध असल्याचे सांगत संवैधानिक पदांचा सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. त्यांनी विरोधकांचे वर्तन नकारात्मक मानसिकतेचे द्योतक असल्याचा आरोप केला. गेल्या नऊ वर्षांत राज्याने गुन्हेगारी आणि अराजकतेतून शिस्तीकडे, कर्फ्यूतून कायद्याच्या राज्याकडे, उपद्रवातून उत्सवाकडे आणि अविश्वासातून आत्मविश्वासाकडे प्रवास केला असल्याचा दावा त्यांनी केला. ‘डबल इंजिन’ सरकारच्या स्पष्ट धोरण, स्वच्छ नीयत आणि निर्णायक नेतृत्वामुळे प्रशासनाची दिशा बदलल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

टिपूला आता कायमचे हद्दपार करा!

रशियाच्या मॉस्कोतील हॉस्टेलमध्ये भीषण आग

“हे राजकीय व्यासपीठ नाही” न्यायालयाने असे का म्हटले?

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना अंतरिम जामीन

२०१७ नंतर राज्यात एकही धार्मिक दंगल झाली नसल्याचा दावा करत त्यांनी पूर्वी ‘वन डिस्ट्रिक्, वन माफिया’सारखी परिस्थिती होती, गुंडा टॅक्स आणि अवैध वसुली सामान्य बाब होती, असे म्हटले. सध्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरण लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश आज ‘टेक्नॉलॉजी, ट्रस्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन’च्या मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देश एआय आणि नवउदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जात असून राज्यही त्याच दिशेने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अयोध्येतील राम मंदिरचे बांधकाम, काशीतील काशी विश्वनाथ धाम   विकास आणि प्रमुख तीर्थस्थळांचे पुनरुत्थान हे नव्या ओळखीचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले. धर्मस्थळे केवळ श्रद्धेची नव्हे तर राष्ट्रीय चेतनेची केंद्रे असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी महाराजा सुहेलदेव स्मारक व विद्यापीठ, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांचाही उल्लेख केला. प्रयागराजमधील महाकुंभ आणि माघ मेळ्याचा संदर्भ देत त्यांनी कोट्यवधी भाविकांची उपस्थिती ही सुशासन आणि सुरक्षिततेवरील वाढत्या विश्वासाचे द्योतक असल्याचे सांगितले. जे राज्य पूर्वी दंग्यांसाठी ओळखले जात होते, ते आज दीपोत्सव, देव दीपावली आणि रंगोत्सवासाठी ओळखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत २.१९ लाखांहून अधिक पोलिसांची भरती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी २० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली. महिला पोलिसांची संख्या १० हजारांवरून ४४ हजारांहून अधिक झाली आहे. सात पोलिस आयुक्तालये, सायबर पोलीस ठाणे, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि आधुनिक पोलिसिंग मॉडेलमुळे व्यवस्था अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात १२ अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब कार्यरत असून सर्व ७५ जिल्ह्यांत फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा उपलब्ध आहे. पीएसीच्या ३४ कंपन्यांचे पुनरुज्जीवन आणि ‘वीरांगना झलकारी बाई’, ‘अवंती बाई’ आणि ‘ऊदा देवी’ या तीन महिला बटालियनच्या स्थापनेचाही त्यांनी उल्लेख केला.

उत्तर प्रदेश आता भय, अराजकता आणि अविश्वासाच्या प्रतिमेतून बाहेर पडून विकास, गुंतवणूक, श्रद्धा आणि आत्मविश्वासाच्या नव्या युगात प्रवेश करत असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा