24 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरराजकारणभारताची दमदार वाटचाल, आम्ही कुणासमोरही झुकणार नाही!

भारताची दमदार वाटचाल, आम्ही कुणासमोरही झुकणार नाही!

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

जागतिक व्यापार तणाव वाढत असताना, विशेषत: रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बिझनेस टुडे इंडिया@100 समिट मध्ये बोलताना सांगितले की भारत “कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही.

भारताच्या भविष्यातील जागतिक व्यापार संघटनांशी संबंधांबद्दल विचारले असता गोयल म्हणाले की भारत आज “खूप मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण” आहे, प्रतिवर्षी भारताची साडेसहा टक्क्याने प्रगती होत आहे आणि पुढे ही गती वाढणार आहे.

“डिग्लोबलायझेशन” चालू आहे, या संकल्पनेला नाकारत त्यांनी स्पष्ट केले की देश फक्त आपले व्यापारमार्ग आणि भागीदार बदलत आहेत. “मला पूर्ण खात्री आहे की भारत यंदा गेल्या वर्षापेक्षा जास्त निर्यात करेल,” असं ते म्हणाले आणि व्यापारातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी पावले उचलली आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

भावी मुक्त व्यापार करारांविषयी गोयल म्हणाले की, भारताची पद्धत फक्त शुल्कसवलती मागण्यापेक्षा पुढे गेली आहे. चार देशांच्या EFTA गटाशी झालेल्या चर्चेची आठवण करून देत त्यांनी सांगितले: “आम्ही ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था. आमच्याकडे तरुणांची ताकद आहे, तर तुमच्याकडे वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या आहे.”

त्यांनी सांगितले की EFTA देशांनी भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे १० लाख थेट रोजगार आणि एकूण ५० लाख रोजगार निर्माण होतील. “१ ऑक्टोबरपासून EFTA करार लागू होणार असून त्याचे फायदे दिसू लागतील,” असे ते म्हणाले.

काँग्रेसवर टीका

गोयल यांनी काँग्रेसच्या खासदारावर टीका करताना सांगितले की भारतीय अर्थव्यवस्थेला “मृत” म्हणणे लाजिरवाणे आहे.
“विरोधी पक्षनेत्याने नकारात्मक वक्तव्यांची पुनरावृत्ती करणे ही शरमेची बाब आहे. मी त्यांचा निषेध करतो आणि खरं सांगायचं तर भारत कधीही राहुल गांधींना माफ करणार नाही, कारण त्यांनी जगाला दाखवली जाणारी भारताची महान परंपरा कमी लेखण्याचे काम केले आहे,” असे ते म्हणाले.

भारताची आर्थिक स्थिरता अधोरेखित करताना गोयल यांनी सांगितले की देशाची चलनस्थिती, परकीय चलनसाठा, शेअरबाजार आणि मूलभूत घटक मजबूत आहेत, तसेच इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात महागाई सर्वात कमी आहे.

“संपूर्ण जग आम्हाला सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखते, जी जागतिक वाढीत १६% योगदान देते,” असे ते म्हणाले. भारतातील १.४ अब्ज तरुण, कुशल आणि प्रगतीशील नागरिक जागतिक भागीदारांसाठी मोठे आकर्षण आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

भारताच्या २००० सालानंतरच्या परिवर्तनाबद्दल बोलताना गोयल यांनी आयटी उद्योगाचे हजारो रोजगार निर्मितीतील योगदान अधोरेखित केले आणि कोविड-१९ संकटाला संधीमध्ये बदलल्याची आठवण करून दिली. “अवघड काळात भारत नेहमी विजयी होईल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

“अमेरिकेने चुकीचे लक्ष्य निवडले”

प्राप्तिकर विधेयक २०२५ मागे घेतले!

५०% टॅरिफचा ट्रंपबम? भारतासाठी तर तो ‘अब्बा-डब्बा-जब्बा’च!

अगस्ता घोटाळ्याचा बिचौलिया गजाआडच!

भावी धोरण

आगामी काळात भारत यूएई, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, EFTA गट, ब्रिटन, युरोपियन युनियन, चिली, पेरू, न्यूझीलंड, अमेरिका आणि इतर अनेक देशांसोबत व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहे, असेही ते म्हणाले.

“आजचा भारत अधिक मजबूत, अधिक सन्मानित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या उंच नेत्याच्या नेतृत्वाखाली आहे,” असे सांगून गोयल यांनी भारताच्या जागतिक व्यापार व्यवस्थेतील उज्ज्वल स्थानाबद्दल आशावाद व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा