29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणप्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता

प्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता

एकनाथ शिंदे गटाकडून केले गेले नवे आरोप

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिंदे गटाचे समर्थक असलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. त्यात ते म्हणतात की, सचिन वाझे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते. सध्या अनिल देशमुख आणि सचिन वाझे तुरुंगात आहेत. पण दर महिन्याला हे लोक वसुली करत होते.

गुलाबराव पाटील यांचे स्वागत मेहकरमध्ये करण्यात आले. त्यावेळी हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रतापराव जाधव यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला. शिवाय, ५० खोके एकदम ओके अशी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना आता शिंदे गटातील समर्थकांनी १०० खोके एकदम ओके असा प्रतिटोला लगावला आहे.

हे ही वाचा:

फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

शाओमीला ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड

ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

 

प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या वक्तव्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आङे की, शिंदे गटाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा आता कंटाळा आला आहे. हे आरोप नीचपणे सुरू आहेत. आरोपांमध्ये काही तथ्य तरी आहे का माहीत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक आरोपाला उत्तर देणार नाही.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यावर गद्दार अशी टीका होऊ लागली. नंतर त्यांनी खोके घेतले अशी टीकाही उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून केली जाऊ लागली. त्याला शिंदे गटाकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जाऊ लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा