32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारणकाँग्रेसच्या निवडणूक चिन्हाची गुरूनानक यांच्या हाताशी तुलना!

काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाची गुरूनानक यांच्या हाताशी तुलना!

पंजाब काँग्रेसच्या प्रमुखांच्या पत्नीच्या विधानावरून खळबळ

Google News Follow

Related

पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वॉरिंग यांच्या पत्नी अमृता वॉरिंग यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाची तुलना पहिले शीख गुरु गुरूनानक यांच्या हाताशी केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. एका निवडणूक कार्यक्रमादरम्यान अमृता वारिंग यांनी केलेल्या टीकेमुळे पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्याकडून तीव्र टीका झाली.

काँग्रेसचे मूळ चिन्ह हात हा गुरूनानक यांचा हात असल्याचा दावा अमृता वॉरिंग यांनी केला. तसेच, पक्षाने हाताचे चिन्ह स्वीकारून आदरणीय शीख गुरूंना श्रद्धांजली वाहिल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. अनेकांनी राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाला धार्मिक चिन्हाशी जोडण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘थोडा शहाणपणा दाखवा, अमृता वॉरिंग. काँग्रेस सरकारने पंजाबमधील तरुणांची हत्या केली. पंजाबला एका अंधाऱ्या काळात ढकलले, आणीबाणी लादली, आमच्या पवित्र गुरुधाम दरबार साहिबवर रणगाडे लादले. हा रक्तरंजित हात गुरू नानकांच्या पंजाच्या बरोबरीचा कसा झाला?’, असा प्रश्न ‘आप’च्या पंजाब युनिटने ‘एक्स’वर विचारला आहे.
सीमावर्ती राज्यातील सत्ताधारी पक्षाने लुधियाना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग वॉरिंग यांच्याकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

हे ही वाचा:

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी

अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत

मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!

आमच्याविरुद्ध लढू न शकणारे आमचे फेक व्हीडिओ पसरवत आहेत!

शिरोमणी अकाली दलानेही अमृता सिंग यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ‘पंजाबमधील या फुटीर गटाने श्री अकाल तख्त साहिबवर हल्ला केला आहे आणि लाखो शीखांना प्रचंड त्रास दिला आहे. कृपया तुमच्या क्षुद्र राजकारणासाठी गुरु साहिबशी त्याची तुलना करू नका,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

भाजपचे माजी आमदार इम्प्रीत सिंग बक्षी यांनीही ‘सत्याकडे दुर्लक्ष करणे भयावह आहे’ अशी टीका केली.
‘विकृती आणि सत्यात फेरफार करण्याचे कृत्य पुरे झाले! सत्याकडे उघड दुर्लक्ष भयावह आहे. गुरुनानक देवजींना राजकीय अजेंड्यात ओढण्यापेक्षा त्यांचा वारसा टिकवणे अधिक योग्य आहे. काँग्रेसजनहो, हीच वेळ आहे घर स्वच्छ करण्याची आणि प्रचारापेक्षा सचोटीला प्राधान्य देण्याची,’ असे बक्षी म्हणाले.

अमरिंदर सिंग वॉरिंग हे भाजपच्या रवनीत बिट्टू विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा