25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारण"राहुल गांधींनी लग्न करावे आणि 'हम दो हमारे दो' याची अंमलबजावणी करावी."

“राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिला आहे. “राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.” असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर ‘हम दो हमारे दो’ असे सरकारचे धोरण असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, “राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”

काँग्रेसनेही जाहीरनाम्यात शेतकरी कायद्याचे वचन दिले होते, याची आठवण आठवले यांनी करून दिलीय. शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले यांनी दिल्लीमधील शेतकरी हे आंदोलन ताणत असल्याची टीका त्यांनी केली. सरकार चर्चेला तयार आहे, पण कायदेच मागे घ्या, ही शेतकऱ्यांची भूमिका असंवैधानिक असल्याची टीकाही त्यांनी केली.

२०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला आंदोलनकारी जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा काही सहभाग नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला कोणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी करावी. असेही आठवले म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा