30 C
Mumbai
Friday, May 16, 2025
घरराजकारण“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार...” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे...

“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार…” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे विधान?

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

Related

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असून अशातच कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री जमीर अहमद खान यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. आपण स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य खान यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक मंत्री जमीर अहमद खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये ते पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी आत्मघातकी बॉम्बसह पाकिस्तानला पाठवण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषदेत खान म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली तर ते युद्धात सामील होण्यास तयार आहेत.

कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान म्हणाले, “आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचा आमच्याशी कधीही संबंध नव्हता. पाकिस्तान नेहमीच आपला शत्रू राहिला आहे. जर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पाकिस्तानात जाऊन युद्ध करण्यास तयार आहे.” पुढे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना एक आत्मघातकी बॉम्ब देण्यास सांगितले असून हा बॉम्ब ते त्यांच्या शरीरावर बांधतील आणि पाकिस्तानात जातील.

पुढे खान म्हणाले की, “जर युद्ध झाले तर मी तयार आहे. एक मंत्री म्हणून मी म्हणत आहे की मी पाकिस्तानशी युद्ध लढण्यास तयार आहे. मी स्वतः भारताच्या वतीने युद्धात भाग घेण्यासाठी तिथे जाईन. गरज पडली तर मी आत्मघातकी बॉम्बरही बनेन. मी मस्करी करत नाहीये. देशाच्या हितासाठी, जर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्बर बनवले तर मी अल्लाहची शपथ घेतो की मी बॉम्ब घालून पाकिस्तानात जाईन.”

हे ही वाचा..

वाचवा!! पाकिस्तानने पदर पसरला

राम मंदिर परिसरात संग्रहालय आणि उद्यानाची योजना

‘वेव्स बाजार’ने पहिल्या ३६ तासांत किती कमवले ?

केदारनाथमध्ये किती भक्तांनी घेतले दर्शन, जाणून घ्या !

कर्नाटकच्या मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि तो निष्पाप नागरिकांवरील घृणास्पद आणि अमानवी कृत्य असल्याचे म्हटले. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ प्रत्येक भारतीयाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा