23.4 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरविशेषसंदेशखळी परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी बळकावल्या

संदेशखळी परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी बळकावल्या

शेतीचे केले मत्स्य तलावात रूपांतर, उपग्रह प्रतिमेतून सत्य समोर

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील पोलिसांनी फरारी टीएमसी नेता शेख शाहजहानला २९ फेब्रुवारी रोजी उत्तर २४ परगणा येथील मिनाखान परिसरातून अटक केली. त्याच्या गुंडांच्या हातून लैंगिक शोषण, बलात्कार, मालमत्ता अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश व्यक्त करणाऱ्या स्थानिक महिलांनी केलेल्या अनेक आठवड्यांच्या निषेधानंतर त्यांची अटक झाली आहे. आता त्याच्या लोकांनी कथितपणे केलेल्या जमिनी हडपल्याच्या उपग्रह प्रतिमा मीडियामध्ये समोर आल्या आहेत. यात शेख शाहजहान आणि त्याच्या गुंडांनी सांगितल्यानुसार गेल्या काही वर्षांमध्ये शेतीचे फिशपॉन्ड्स मध्ये रुपांतर झाले आहे.
एका वृत्तानुसार सॅटेलाइट डेटावरून असे दिसून आले आहे की २०१३ पासून पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथील शेतजमिनीच्या मोठ्या विस्ताराचे तलावांमध्ये रूपांतर झाले होते. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अटक करण्यात आलेला स्थानिक टीएमसी नेता शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांनी बळजबरीने कब्जा करून हि जमीन वापरासाठी पुन्हा तयार केली आहे.

हेही वाचा..

शरीरसौष्ठवपटूंचा ऑस्कर ‘मुंबई श्री’ स्पर्धा ९ मार्चला

इस्रोच्या लाँचपॅडवरील ‘चिनी ध्वजा’ च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!

पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या या डेल्टा प्रदेशात ज्या ठिकाणी गावकरी तांदूळ, मुख्य अन्नधान्य पिकवत असत त्या जमिनी या प्रतिमांमध्ये दिसतात. संदेशखळी ब्लॉक १ मधील बोयरमारी, हातगाछी, नलकारा, सरबेरिया आणि राजबारी भाग मोठ्या प्रमाणात प्रभावित केल्या आहेत. तसेच संदेशखळी ब्लॉक २ मधील त्रिमोनी बाजार, झुपखळी, माझेरपारा आणि बेरमुजूर भागातही मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या गेल्या आहेत. मत्स्यशेतीसाठी शेकडो एकर जमिनीचे तलावात रूपांतर झाले. शेतकरी व मूळ जमीन मालकांना दरवर्षी पाच ते सहा हजार रुपये भाडेपट्ट्याने द्यायला भाग पाडले जात होते. स्थानिकांनी याला विरोध केल्यावर या गुंडांनी बळजबरीने जमिनी संपादित करून खारे पाण्याचे तलाव बनवले.

रूपदासी सरदार या ६० च्या दशकातील आदिवासी महिला म्हणाल्या, उत्तम सरदार (शेख शाहजहानचे जवळचे सहकारी) यांनी माझी ३.३ बिघा जमीन भाडेतत्त्वावर घेतली पण देऊ केलेली रक्कम कधीही दिली नाही. संदेशखळीतील जे लोक एकेकाळी या जमिनींमध्ये अन्नधान्य, तांदूळ आणि इतर मुख्य अन्नधान्य पिकवत होते त्यांना आता बाजारपेठेतील महागड्या किमतीत दुकानातून धान्य खरेदी करावे लागत आहे. शिवाय आता त्यांच्या मालकीच्याही जमिनी राहिलेल्या नाहीत. रूपांतरित जमिनीचे अचूक एकूण क्षेत्र अनिश्चित आहे. अंदाजानुसार ते एक हजार एकरपेक्षा जास्त आहे. हा अंदाज अंतराळातील तुलनेने लहान क्षेत्राच्या निरीक्षणावर आधारित आहे.

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा