28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषबारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

Google News Follow

Related

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू इथं होणाऱ्या रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. बारसू रिफायनरी संदर्भात मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात तपशीलवार माहिती दिली. या प्रकल्पालासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सामंत म्हणाले, राजन साळवी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती. याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करत आहेत आणि जे समर्थन करत आहेत, या सर्वांच्या शंका दूर करायच्या आहेत पण आधी याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले स्थानिक आमदार राजन साळवी यांनी आमच्या विभागाला या रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र दिलं होतं त्यावर सांगोपांग चर्चा झाली असे उद्योगमंत्री म्हणाले.

हे ही वाचा : 

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार

स्थानिकांचा विचार करून रिफायनरी आणणार आहे. स्थानिकांची मागणी मान्य केली आहे. सकारात्मक चर्चा झाली. रिफायनरी बैठकीचा कोणताही राजकीय हेतू नाही. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर कोणताही दबाव टाकणार नाही. रिफायनरी संदर्भातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करू. स्थानिकांच्या विकासाचा विचार करूनच प्रकल्प आणणार असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पाच्या २,९०० एकर जागेसाठी तेथील जमीन मालकाकांची संमतीपत्र मिळाली आहेत. प्रकल्पाचा आवाका २ लाख कोटीचा आहे. यामध्ये बांधकाम टप्प्यात सुमारे १ लाख लोकांना रोजगार, कामकाज टप्प्यात मध्ये ३ लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार ७५ हजार लोकांना मिळणार आहे, असंही यावेळी सामंत यांनी सांगितलं. आपल्या मतदारसंघातील जनतेच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची भूमिका असते. विकासात्मक क्रांती करणारा प्रकल्प जो राजापूरमध्ये येतोय त्यासंदर्भात राजन साळवी यांनी सकारात्मक भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो असेही सामंत म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा