लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांबाबत भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसवर हल्लाबोल केला जात आहे.
भाजपने राहुल गांधींच्या या विधानाला भारताच्या संवैधानिक संस्थेचा अपमान असल्याचे म्हटले आहे आणि म्हटले आहे की राहुल गांधी यांनी परदेशात भारताची बदनामी करण्याचा ठेका घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील राहुल गांधींवर निशाना साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिकेत जाऊन उर बडवणे हा बहुधा राहुल गांधींच्या छंद असल्याचे भातखळकर म्हणाले आहेत.
अमेरिकेत जाऊन उर बडवणे हा बहुधा राहुल गांधींच्या छंद आहे. ते देशाला कलंकित करायला जातात, म्हणून देशवासी दर निवडणुकीत त्यांचे तोंड काळे करतो. त्यांना बहुधा त्या काळया तोंडाचे कौतुक आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा :
ओक्लाहोमा मध्ये वादळामुळे तिघांचा मृत्यू
आम आदमी पक्ष निवडणुकीपासून पळ काढतेय
‘आप’ची महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार, भाजपाचा मार्ग मोकळा!
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, २००४ मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेचा डेटा बघितला तर त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत चार महिन्यात लाखो मतदार वाढले होते. २००९ मध्ये देखील लोकसभेनंतर विधानसभेमध्ये लाखो मतदार वाढले होते. त्यावेळी केंद्र आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकारे सत्तेवर आली होती. पण राहुल गांधी ज्याला ‘मेथड इन मैडनेस’ म्हटले जाते त्यापद्धतीने ते वारंवार बोलत आहेत. कारण त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. परदेशात जाऊन ते लोकशाही संघटनेवर बोट दाखवत आहेत आणि हा माझ्या मते देशद्रोहाचा गुन्हा आहे, असे भातखळकर यांनी म्हटले.
अमेरिकेत जाऊन उर बडवणे हा बहुधा राहुल गांधींच्या छंद आहे. ते देशाला कलंकित करायला जातात, म्हणून देशवासी दर निवडणुकीत त्यांचे तोंड काळे करतो. त्यांना बहुधा त्या काळया तोंडाचे कौतुक आहे. https://t.co/0VDcz8DiAR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2025