29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेष'जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही'

‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’

मुर्शिदाबाद प्रकरणी उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.यावर सुनावणी करत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.यासोबतच न्यायालयाने निवडणूक आयोगाला सध्याची परिस्थिती पाहता बेरहामपूर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलण्यास सांगितले आहे. वास्तविक, या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले की, ज्या मतदारसंघात जातीय हिंसाचार झाला त्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक होऊ देणार नाही.न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘जर लोक ८ तास शांततेने कोणत्याही सणाचा आनंद घेऊ शकत नाहीत आणि साजरा करू शकत नसतील, तर अशा मतदारसंघात लोकसभा निवडणूक घेऊ नये, अशी शिफारस आम्ही निवडणूक आयोगाकडे करू.’ न्यायालयाने कडक शब्दात म्हटले की, ‘आदर्श आचारसंहिता लागू असूनही लोकांचे दोन गट भांडत असतील, तर एकमेकांना आपल्या प्रतिनिधीला मतदान करण्याचा अधिकार नाही.’

हे ही वाचा:

भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?

सिद्धरामय्या यांनी घेतली नगरसेवक हिरेमठ यांची भेट

कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’

कोलकात्यातही २३ ठिकाणी उत्सव साजरे केले गेले पण कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.दरम्यान, हायकोर्टाने राज्य पोलिसांना जातीय दंगलीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.या प्रकरणाची सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा