भारताचे विदेश सचिव विक्रम मिस्री दोन दिवसीय अधिकृत दौर्यावर रविवारी नेपाळात पोहोचले. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत राजदूत गहेंद्र राजभंडारी यांनी केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर विदेश सचिव विक्रम मिस्री आणि पंतप्रधान ओली यांची भेट झाल्याचे छायाचित्र शेअर केले. मंत्रालयाने माहिती दिली की, भारताचे विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी सिंहदरबार स्थित आपल्या कार्यालयात माननीय पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली, जिथे नेपाळ-भारत संबंध अधिक दृढ करण्यासाठी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यापूर्वी मिस्री यांच्या काठमांडूत आगमनाच्या वेळी झालेल्या स्वागताचे छायाचित्रही शेअर करण्यात आले. विमानतळावर त्यांना गहेंद्र राजभंडारी यांनी रिसीव्ह केले होते. काठमांडूस्थित भारतीय दूतावासाने एक्सवर लिहिले, “भारताचे विदेश सचिव विक्रम मिस्री अधिकृत दौर्यावर काठमांडूत पोहोचले आहेत. हे भारत-नेपाळ यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदानाच्या परंपरेचे प्रतिक आहे आणि ‘पड़ोसी पहले’ या धोरणाबद्दल भारताची बांधिलकी दाखवते.”
हेही वाचा..
साहिबगंजमध्ये अवैध खाणकामावर कारवाई
मुंबईत मुसळधार पावसात इंडिगोने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी केली जारी
‘धर्मस्थळ चला अभियान’चा समारोप
पटन्यात विद्यार्थ्याची गोळी घालून हत्या !
विदेश सचिव मिस्री नेपाळचे विदेश सचिव अमृत बहादुर राय यांच्या निमंत्रणावरून नेपाळात आले आहेत. या दौर्यादरम्यान भारतीय विदेश सचिव पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याशिवाय नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचीही भेट घेतील. तसेच, नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेरबहादुर देउबा आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टी-माओवादी सेंटरचे अध्यक्ष पुष्पकमल दाहाल ‘प्रचंड’ यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशीही ते भेट घेणार आहेत.
भारतीय विदेश मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले, “भारत आणि नेपाळ यांच्यात मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ज्यामध्ये अलीकडच्या वर्षांत प्रगती झाली आहे. भारत आपल्या ‘पड़ोसी प्रथम’ धोरणांतर्गत नेपाळला उच्च प्राधान्य देतो. विदेश सचिवांचा हा आगामी दौरा, दोन्ही देशांतील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदानाच्या परंपरेचा आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण अवसर आहे.” नेपाळच्या विदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौर्यादरम्यान दोन्ही देशांचे विदेश सचिव नेपाळ-भारत भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा करतील, ज्यामध्ये कनेक्टिव्हिटी, विकास सहकार्य आणि परस्पर हिताचे इतर मुद्दे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.







