राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीला अधोरेखित केले. हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीचे विचारवंत व्ही. डी. सावराकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करून मोहन भागवत यांनी म्हटले की, यामुळे खरोखरच या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल.
“वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल,” असे वक्तव्य मोहन भागवत यांनी रविवारी मुंबईत केलेल्या आपल्या भाषणात सांगितले. तसेच त्यांनी सावरकरांचा उल्लेख “शूर” असा केला. दुसरीकडे, स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तुरुंगात असताना ब्रिटिशांना केलेल्या दयेच्या अर्जांवरून काँग्रेस सावरकरांना “देशद्रोही” म्हणते आणि असे असताना त्यांना सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा:
फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी ११४ राफेल लढाऊ विमानांचा होणार करार?
“टेक्सासमधील डॅलस परिसरात फिरताना वाटते पाकिस्तानमध्ये आहोत”
हार्ले-डेव्हिडसनला टॅरिफमुक्त प्रवेश, टेस्लाला दिलासा नाही
देशात यूपीआय व्यवहारांचा नवा उच्चांक
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना मोहन भागवत यांना त्यांच्या वयाबद्दलही विचारण्यात आले. गेल्या सप्टेंबरमध्ये मोहन भागवत ७५ वर्षांचे झाले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही ७५ वर्षांचे झाले. भाजपने अनौपचारिक निवृत्तीचे वय ७५ असल्याने विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. “सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की ७५ वर्षांचे झाल्यानंतर, कोणतेही पद न घेता काम करावे. मी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि आरएसएसला यासंबंधी कळवले होते, परंतु संघटनेने मला काम करत राहण्यास सांगितले. जेव्हा आरएसएस मला पद सोडण्यास सांगेल तेव्हा मी ते करेन, परंतु कामातून निवृत्त कधीही होणार नाही,” असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, आरएसएस प्रमुखपदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही. प्रादेशिक आणि विभागीय प्रमुख प्रमुखाची नियुक्ती करतात.भागवत म्हणाले की, संघाचे काम प्रचार करण्याबद्दल नाही तर “संस्कार” (मूल्ये) रुजवण्याबद्दल आहे.







